शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सायकलिंग’द्वारे जीवनशैली बदलविण्याचा तरुणाईला संदेश

By admin | Updated: February 8, 2016 01:10 IST

आजच्या सुपरफास्ट जगात लोकांजवळ सगळं काही आहे. फक्त शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळं काही मिळविण्याच्या नादात मनुष्याने आपली जीवनशैली मात्र गमावली आहे.

सचिन सरपटवार भद्रावतीआजच्या सुपरफास्ट जगात लोकांजवळ सगळं काही आहे. फक्त शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळं काही मिळविण्याच्या नादात मनुष्याने आपली जीवनशैली मात्र गमावली आहे. प्रचंड धकाधकीच्या, ताणतणावाच्या व आधुनिकतेचे अवडंबर करणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. काळाची हिच गरज ओळखून भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे यांनी सायकलिंगद्वारे जीवनशैली बदलविण्याचा एक संदेश तरुणाईला दिला आहे.एकेकाळी प्रत्येक घरची गरज असलेली ‘सायकल’ हल्ली कुठेतरी अडगळीत पडलेली सापडते. आज प्रत्येक जण दुचाकी, चारचाकी वाहनाच्या अहारी गेले आहे. यावर मात करण्यासाठी शरीरयष्टी टिकवून ठेवण्यासाठी डॉ. शिंदे यांनी दररोज ‘सायकलिंग’ करायला सुरूवात केली. सध्या ते दररोज ३० ते ४० किलोमिटरचे अंतर सायकलने पार करतात. दर आठवड्याला एक दिवस लांब पल्ला असतो. याअंतर्गत ते सायकलने नागपूरला जावून आले. पहाटे ४ वाजता येथील टप्प्यावरून निघून ते साडे सहा तासात नागपूरला पोहचले. यापूर्वी त्यांनी वरोरा, आनंदवन, टेमुर्डा, चंद्रपूर, तेलवासा, ढोरवासा, कोंढा, माजरीपर्यंत सायकलने प्रवास केला आहे.वर्षभराआधी डॉ. धनंजय बोकारे (नागपूर) यांचे फेसबुकवरील सायकलस्वारी (मनाली ते लेह) संबंधीची पोस्ट पाहून सायकलिंगकडे आकर्षित झाल्याचे डॉ. विवेक शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांचे मित्र अनिरूद्ध राईच यांचे सायकलप्रती असलेले प्रेम पाहून प्रेरित झाले. दोन ते तीन मित्रांंनी व्यायाम म्हणून सुरू केलेला सायकलिंग हा प्रकार अगोदर छंद व नंतर त्यांचा श्वास, हृदय, मासपेंशी व शरीराच्या व्यायामासाठी ‘सायकलिंग’ हा सर्वोत्कृष्ट व्यायाम असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.आजच्या परिस्थितीत समाजाला भेडसावणाऱ्या कितीतरी समस्यांचे उत्तर ‘सायकल’ या शब्दात असु शकते. पर्यावरण संरक्षण, शारीरिक-आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, वाहतुकीच्या कोंडीची समस्या, इंधन बचत अशा कितीतरी गोष्टी सायकलच्या वापराने तसेच सायकलिंगच्या व्यायामाने सुटू शकतात. ज्याप्रमाणे दिल्लीत वाहतुकीच्या समस्येसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला अनिवार्य झाला तोच प्रकार आपल्या भागात भविष्यात लागू होवू शकतो. सायकलीचा वापर नाईलाजास्तव करण्याची पाळी आपल्यावर येण्याआधी आपण ती स्वेच्छेने स्वीकारावी, असा संदेश डॉ. शिंदे यांनी दिला.