शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘सायकलिंग’द्वारे जीवनशैली बदलविण्याचा तरुणाईला संदेश

By admin | Updated: February 8, 2016 01:10 IST

आजच्या सुपरफास्ट जगात लोकांजवळ सगळं काही आहे. फक्त शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळं काही मिळविण्याच्या नादात मनुष्याने आपली जीवनशैली मात्र गमावली आहे.

सचिन सरपटवार भद्रावतीआजच्या सुपरफास्ट जगात लोकांजवळ सगळं काही आहे. फक्त शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळं काही मिळविण्याच्या नादात मनुष्याने आपली जीवनशैली मात्र गमावली आहे. प्रचंड धकाधकीच्या, ताणतणावाच्या व आधुनिकतेचे अवडंबर करणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. काळाची हिच गरज ओळखून भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे यांनी सायकलिंगद्वारे जीवनशैली बदलविण्याचा एक संदेश तरुणाईला दिला आहे.एकेकाळी प्रत्येक घरची गरज असलेली ‘सायकल’ हल्ली कुठेतरी अडगळीत पडलेली सापडते. आज प्रत्येक जण दुचाकी, चारचाकी वाहनाच्या अहारी गेले आहे. यावर मात करण्यासाठी शरीरयष्टी टिकवून ठेवण्यासाठी डॉ. शिंदे यांनी दररोज ‘सायकलिंग’ करायला सुरूवात केली. सध्या ते दररोज ३० ते ४० किलोमिटरचे अंतर सायकलने पार करतात. दर आठवड्याला एक दिवस लांब पल्ला असतो. याअंतर्गत ते सायकलने नागपूरला जावून आले. पहाटे ४ वाजता येथील टप्प्यावरून निघून ते साडे सहा तासात नागपूरला पोहचले. यापूर्वी त्यांनी वरोरा, आनंदवन, टेमुर्डा, चंद्रपूर, तेलवासा, ढोरवासा, कोंढा, माजरीपर्यंत सायकलने प्रवास केला आहे.वर्षभराआधी डॉ. धनंजय बोकारे (नागपूर) यांचे फेसबुकवरील सायकलस्वारी (मनाली ते लेह) संबंधीची पोस्ट पाहून सायकलिंगकडे आकर्षित झाल्याचे डॉ. विवेक शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांचे मित्र अनिरूद्ध राईच यांचे सायकलप्रती असलेले प्रेम पाहून प्रेरित झाले. दोन ते तीन मित्रांंनी व्यायाम म्हणून सुरू केलेला सायकलिंग हा प्रकार अगोदर छंद व नंतर त्यांचा श्वास, हृदय, मासपेंशी व शरीराच्या व्यायामासाठी ‘सायकलिंग’ हा सर्वोत्कृष्ट व्यायाम असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.आजच्या परिस्थितीत समाजाला भेडसावणाऱ्या कितीतरी समस्यांचे उत्तर ‘सायकल’ या शब्दात असु शकते. पर्यावरण संरक्षण, शारीरिक-आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, वाहतुकीच्या कोंडीची समस्या, इंधन बचत अशा कितीतरी गोष्टी सायकलच्या वापराने तसेच सायकलिंगच्या व्यायामाने सुटू शकतात. ज्याप्रमाणे दिल्लीत वाहतुकीच्या समस्येसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला अनिवार्य झाला तोच प्रकार आपल्या भागात भविष्यात लागू होवू शकतो. सायकलीचा वापर नाईलाजास्तव करण्याची पाळी आपल्यावर येण्याआधी आपण ती स्वेच्छेने स्वीकारावी, असा संदेश डॉ. शिंदे यांनी दिला.