शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पारा ४४ अंशावर, वाहनाचे टायर्स तपासले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 19:14 IST

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी बाहेर पडताना प्रथम टायरमधील हवा तपासणी पाहिजे.

ठळक मुद्देटायर फटून अपघात होण्याची शक्यता

चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाहनाचे टायर फुटून अपघाताच्या घटना घडतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहे. त्यातच यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी बाहेर पडताना प्रथम टायरमधील हवा तपासणी पाहिजे.

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब वाढतो. त्यातच सिमेंट, डांबर रस्ते तापत असल्याने सातत्याने होणाऱ्या घर्षणातून कमजोर असलेले टायर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यता बाहेर पडताना टायरमधील हवा तपासून घ्यावी, दुपारच्या वेळी कामाशिवाय प्रवास करणे टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.

दुपारी वाहन न चालविलेले बरे

सध्या तापमान वाढले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळणेच आरोग्य तसेच वाहनांसाठी गरजेचे आहे. उन्हामुळे रस्ते तापलेले असतात. अशावेळी भरधाव वेगाने वाहन चालविल्यास टायर फुटू शकतो.

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यामध्ये गाडी धावत असताना टायरमधील हवेचा दाब अचानक वाढते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नियमितपणे हवा तपासणी पाहिजे. महिन्यातून एक दोन वेळा हायड्रोजन गॅसने वाहनात हवा भरल्यास टायर थंड राहते. शक्यतो जुने टायर वापरू नये.

टायर फुटून अपघात वाढले

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टायर फुटून अपघात वाढल्याच्या दरवर्षी घटना घडतात. विशेषत: एप्रिल, मे मध्ये याचे प्रमाण अधिक असते. सिमेंट तसेच डांबरीरस्त्यामध्ये टायरचे घर्षण होते. टायर जुने असेल तर अपघात होताे. त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाव योग्य प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे.

तापमान ४४ अंशावर

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशापर्यंत पोहचले आहे. सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे शक्यता कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.

टॅग्स :weatherहवामानcarकार