शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

शहर फेरीवाला समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:37 IST

शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ‘फेरीवाला क्षेत्र' निश्चित करण्यासाठी त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्वेक्षण बंद झाल्यावर कुठलाही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन महिन्यात फेरीवाल्यांनी पालिकेकडे नोंदणी करावी.

ठळक मुद्देआयुक्त : फेरीवाल्यांनी महानगरपालिकेकडे नोंदणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ‘फेरीवाला क्षेत्र' निश्चित करण्यासाठी त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्वेक्षण बंद झाल्यावर कुठलाही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन महिन्यात फेरीवाल्यांनी पालिकेकडे नोंदणी करावी. तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून बायोमेट्रिक नोंदणीस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत केले.चंद्रपूर शहर महानगरपालिकेत शहर फेरीवाला समितीची बैठक बुधवारी आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत शहरी फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करणे, त्यांना ओळखपत्र वाटप, शहर फेरीवाला आराखडा तयार करणे, फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करणे इत्यादींचा समावेश आहे. फेरीवाला धोरणाच्या प्रभावी व योग्य अंमलबजावणीसाठी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यीय शहर फेरीवाला समिती गठीत करण्यात आली आहे. ज्यात महानगरपालिका प्रतिनिधी, पोलीस, वाहतूक पोलीस, सामाजिक संघटना, यासह ४० टक्के फेरीवाले प्रतिनिधींचा समावेश आहे.महानगरपालिकेने नेमलेल्या त्रयस्थ एजंसीद्वारे फेरीवाल्यांच्या जागेवर जाऊन अ‍ॅप आधारित सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासन संचानालयाने तयार केलेल्या आधारकार्ड आधारित मोबाइल अ‍ॅप सॉफ्टवेअरद्वारे सर्वेक्षण करण्यासह बायोमेट्रिक नोंदणी करण्याचा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. यानुसार सर्व फेरीवाले, पथविक्रत्यांकडे आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच सध्या चालू असलेला मोबाइल क्रमांक हा आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच फेरीवाल्यांना, विक्रेत्यांना ओळखपत्र दिले जाणार आहेत.