शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खाण पर्यटनाला मान्यता द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 00:51 IST

जिल्ह्यातील भूमिगत व खुल्या कोळसा खाणींबद्दल पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे.

सुधीर मुनगंटीवार : २५ लाख वृक्षारोपणाचे पीयूष गोयल यांचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील भूमिगत व खुल्या कोळसा खाणींबद्दल पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे खाण मंत्रालयाने त्यासाठी चंद्रपूरला मदत करावी, अशी मागणी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय ऊर्जा व खाण मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. याबद्दल सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले आहे . चार कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वांकांक्षी मोहिमेची माहिती देण्यासाठी व उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ना.मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांची नवी दिल्ली येथे श्रमशक्ती भवनात भेट घेतली. वृक्ष लागवडीच्या तयारीची त्यांना माहिती दिली. यावेळी पुढच्या वर्षी खनन मंत्रालयाच्या वतीने राज्यात २५ लाख वृक्षारोपण करण्यात येणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री गोयल यांनी ना. मुनगंटीवार यांना दिले. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील खाणविषयक बाबींवर चर्चा झाली.चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणात कोळसा खाणी आहेत. या खाणी पाहण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक, अभ्यासक येत असतात. त्यांना भूमिगत व खुल्या खाणींचे प्रचंड कुतूहल असते. जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्यामुळे खाण पर्यटन अशी अभिनव संकल्पना येथे सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. या खुल्या व भूमिगत खाण पर्यटनातून स्थानिकांना रोजगारही मिळेल. या मागण्यांच्या पूर्ततेबाबत केंद्रीय मंत्री गोयल यांनी सकारात्मकता दशबिली आणि यासंबंधी विभागाला त्वरित योग्य निर्देश देण्यात येईल, असेही सांगितले. जिल्ह्यातील जनतेचे उदरनिवार्हाचे साधन कोळसा खाणींवर अवलंबून आहे. या खाणींचा व जिल्ह्याचा बहुतेक भाग हा वेर्स्टन कोल्ड फिल्ड लिमिटेडच्या मालकीचा असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात वर्षी २५ लाख वृक्षारोपण केंद्रीय खाण मंत्रालयाच्या वतीने करण्यात यावे. यासह जिल्हयातील स्वच्छता, प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी डब्ल्यूसीएलने स्वीकारावी, अशी विनंती ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक बहुतेक जनतेचा व्यवसाय हा कोळशाशी संबधित आहे. या व्यवसायिकांना नियमित कोळसा उपलब्ध व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. मनेका गांधी यांच्याकडूनवृक्षारोपण मोहिमेचे कौतुकना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची शास्त्री भवन येथे भेट घेऊन त्यांना १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. ना. मनेका गांधी यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात राज्यात येण्याचे आश्वासन दिले.अग्रीम निधी न भरण्याची सवलत मिळावीराज्य शासनाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ सुरू केली आहे. याकरिता राज्य शासनाने आर्थिक तरतूदीचे नियोजन केले आहे. राज्य शासन महागडे व्याजदर असणारे कर्ज फेडत आहे. असे कर्ज फेडताना राज्य शासनाला अग्रीम रक्कम भरावी लागते. हा अग्रीम निधी न भरण्याची राज्य शासनाला सवलत मिळावी. त्यामुळे राज्य शासनाला दरवर्षी ३ ते ४ हजार कोटी रूपयांची बचत करता येईल. खुल्या बाजारातून कर्ज उपलब्धतेची मयार्दा १५ हजार कोटींपर्यंत करण्यात यावी, अशी मागणीही ना. मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली.