शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

क्षणार्धात ‘त्यांच्या’ नशिबी आले उघड्यावरचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:19 IST

शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

ठळक मुद्देअश्रू अनावर : प्रेमनगरातील स्थलांतरित कुटुंबीयांची व्यथा

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजीवती : शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाºया प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. क्षणार्धात अख्ये गाव सुनसान झाले. कुणी नातलगाचा आश्रय घेऊन गुराच्या पडक्या गोठ्यात आपले बस्तान मांडले तर कुणी आपल्याच जुन्या पडक्या घरात बस्तान मांडले. ‘लोकमत’ने गुरुवारी या गावाला भेट दिली असता त्यांचे उघड्यावरचे जिणे व आक्रोशच दिसून आला.जीवती तालुक्यातील नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथील काही नागरिकांनी शेती करण्यासाठी त्रास होत असल्याने दहा वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील कोलामानजिक व त्याच्या शेताच्या बाजुलाच ११ घरांची वस्ती थाटली होती. सर्व काही सुरळीतपणे चालत असताना जमापुंजी खर्च करून उभारलेल्या कुडा-मातीच्या घरात त्यांचे मनही रमले होते. मात्र या सुखी संसाराला आरक्षणाची कीड लागली अन् क्षणार्धात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. काही तासातच घर असलेली कुटुंबे बेघर झाली. पोलिसांच्या साक्षीने आपला बिºहाड जुनी वस्ती सेवादासनगरमध्ये हलविला. पण राहायचे कुठे हा प्रश्न पडला असताना त्यांचे नातलग त्यांच्या मदतीला धावून आले आणि आपल्याच गुराच्या गोठ्यात राहण्यासाठी आश्रय दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता विदारक स्थिती बघायला मिळाली. आपली व्यथा सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाही. एकीकडे चुल तर त्याच शेजारी मुल घेऊन चिंतेत पडलेल्या कुटुंबातील माणसं बसली होती. धनराज आडे, विश्वनाथ आडे, रघुनाथ आडे, वैजनाथ आडे, प्रभु जाधव, उत्तम जाधव या ग्रामस्थांनी ‘लोकमत’जवळ व्यथा मांडली.जगण्यासाठी संघर्ष सुरूचसेवादासनगर येथून तेलंगणाच्या कोलामानजिक जाऊन शेती करणे आम्हाला खूप कठीण झाले होते. पावसाळ्यात तर खूप त्रास व्हायचा. कधी-कधी तर अंधारही व्हायचा. आम्ही घरी येईपर्यंत आमची मुले उपाशी राहायची. त्यामुळे आम्ही शेतालगत घरे उभारून जगण्याचा निर्णय घेतला होता. जगण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा होता की आमचे नशीबच फुटके होते माहित नाही. गेली अनेक वर्ष भटंकती करण्यात गेली. आजही भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशा शब्दात आपली करूण कहानी गावकºयांनी सांगितली.अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारया गावचे सरपंच विमल राठोड, जि.प. सदस्य कमल राठोड तसेच पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्याशी चर्चा केली असता प्रेमनगरातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असून त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.