शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

क्षणार्धात ‘त्यांच्या’ नशिबी आले उघड्यावरचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:19 IST

शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

ठळक मुद्देअश्रू अनावर : प्रेमनगरातील स्थलांतरित कुटुंबीयांची व्यथा

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजीवती : शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाºया प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. क्षणार्धात अख्ये गाव सुनसान झाले. कुणी नातलगाचा आश्रय घेऊन गुराच्या पडक्या गोठ्यात आपले बस्तान मांडले तर कुणी आपल्याच जुन्या पडक्या घरात बस्तान मांडले. ‘लोकमत’ने गुरुवारी या गावाला भेट दिली असता त्यांचे उघड्यावरचे जिणे व आक्रोशच दिसून आला.जीवती तालुक्यातील नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथील काही नागरिकांनी शेती करण्यासाठी त्रास होत असल्याने दहा वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील कोलामानजिक व त्याच्या शेताच्या बाजुलाच ११ घरांची वस्ती थाटली होती. सर्व काही सुरळीतपणे चालत असताना जमापुंजी खर्च करून उभारलेल्या कुडा-मातीच्या घरात त्यांचे मनही रमले होते. मात्र या सुखी संसाराला आरक्षणाची कीड लागली अन् क्षणार्धात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. काही तासातच घर असलेली कुटुंबे बेघर झाली. पोलिसांच्या साक्षीने आपला बिºहाड जुनी वस्ती सेवादासनगरमध्ये हलविला. पण राहायचे कुठे हा प्रश्न पडला असताना त्यांचे नातलग त्यांच्या मदतीला धावून आले आणि आपल्याच गुराच्या गोठ्यात राहण्यासाठी आश्रय दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता विदारक स्थिती बघायला मिळाली. आपली व्यथा सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाही. एकीकडे चुल तर त्याच शेजारी मुल घेऊन चिंतेत पडलेल्या कुटुंबातील माणसं बसली होती. धनराज आडे, विश्वनाथ आडे, रघुनाथ आडे, वैजनाथ आडे, प्रभु जाधव, उत्तम जाधव या ग्रामस्थांनी ‘लोकमत’जवळ व्यथा मांडली.जगण्यासाठी संघर्ष सुरूचसेवादासनगर येथून तेलंगणाच्या कोलामानजिक जाऊन शेती करणे आम्हाला खूप कठीण झाले होते. पावसाळ्यात तर खूप त्रास व्हायचा. कधी-कधी तर अंधारही व्हायचा. आम्ही घरी येईपर्यंत आमची मुले उपाशी राहायची. त्यामुळे आम्ही शेतालगत घरे उभारून जगण्याचा निर्णय घेतला होता. जगण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा होता की आमचे नशीबच फुटके होते माहित नाही. गेली अनेक वर्ष भटंकती करण्यात गेली. आजही भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशा शब्दात आपली करूण कहानी गावकºयांनी सांगितली.अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारया गावचे सरपंच विमल राठोड, जि.प. सदस्य कमल राठोड तसेच पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्याशी चर्चा केली असता प्रेमनगरातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असून त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.