शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

क्षणार्धात ‘त्यांच्या’ नशिबी आले उघड्यावरचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:19 IST

शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

ठळक मुद्देअश्रू अनावर : प्रेमनगरातील स्थलांतरित कुटुंबीयांची व्यथा

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजीवती : शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाºया प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. क्षणार्धात अख्ये गाव सुनसान झाले. कुणी नातलगाचा आश्रय घेऊन गुराच्या पडक्या गोठ्यात आपले बस्तान मांडले तर कुणी आपल्याच जुन्या पडक्या घरात बस्तान मांडले. ‘लोकमत’ने गुरुवारी या गावाला भेट दिली असता त्यांचे उघड्यावरचे जिणे व आक्रोशच दिसून आला.जीवती तालुक्यातील नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथील काही नागरिकांनी शेती करण्यासाठी त्रास होत असल्याने दहा वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील कोलामानजिक व त्याच्या शेताच्या बाजुलाच ११ घरांची वस्ती थाटली होती. सर्व काही सुरळीतपणे चालत असताना जमापुंजी खर्च करून उभारलेल्या कुडा-मातीच्या घरात त्यांचे मनही रमले होते. मात्र या सुखी संसाराला आरक्षणाची कीड लागली अन् क्षणार्धात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. काही तासातच घर असलेली कुटुंबे बेघर झाली. पोलिसांच्या साक्षीने आपला बिºहाड जुनी वस्ती सेवादासनगरमध्ये हलविला. पण राहायचे कुठे हा प्रश्न पडला असताना त्यांचे नातलग त्यांच्या मदतीला धावून आले आणि आपल्याच गुराच्या गोठ्यात राहण्यासाठी आश्रय दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता विदारक स्थिती बघायला मिळाली. आपली व्यथा सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाही. एकीकडे चुल तर त्याच शेजारी मुल घेऊन चिंतेत पडलेल्या कुटुंबातील माणसं बसली होती. धनराज आडे, विश्वनाथ आडे, रघुनाथ आडे, वैजनाथ आडे, प्रभु जाधव, उत्तम जाधव या ग्रामस्थांनी ‘लोकमत’जवळ व्यथा मांडली.जगण्यासाठी संघर्ष सुरूचसेवादासनगर येथून तेलंगणाच्या कोलामानजिक जाऊन शेती करणे आम्हाला खूप कठीण झाले होते. पावसाळ्यात तर खूप त्रास व्हायचा. कधी-कधी तर अंधारही व्हायचा. आम्ही घरी येईपर्यंत आमची मुले उपाशी राहायची. त्यामुळे आम्ही शेतालगत घरे उभारून जगण्याचा निर्णय घेतला होता. जगण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा होता की आमचे नशीबच फुटके होते माहित नाही. गेली अनेक वर्ष भटंकती करण्यात गेली. आजही भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशा शब्दात आपली करूण कहानी गावकºयांनी सांगितली.अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारया गावचे सरपंच विमल राठोड, जि.प. सदस्य कमल राठोड तसेच पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्याशी चर्चा केली असता प्रेमनगरातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असून त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.