शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

क्षणार्धात ‘त्यांच्या’ नशिबी आले उघड्यावरचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:19 IST

शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

ठळक मुद्देअश्रू अनावर : प्रेमनगरातील स्थलांतरित कुटुंबीयांची व्यथा

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजीवती : शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाºया प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. क्षणार्धात अख्ये गाव सुनसान झाले. कुणी नातलगाचा आश्रय घेऊन गुराच्या पडक्या गोठ्यात आपले बस्तान मांडले तर कुणी आपल्याच जुन्या पडक्या घरात बस्तान मांडले. ‘लोकमत’ने गुरुवारी या गावाला भेट दिली असता त्यांचे उघड्यावरचे जिणे व आक्रोशच दिसून आला.जीवती तालुक्यातील नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथील काही नागरिकांनी शेती करण्यासाठी त्रास होत असल्याने दहा वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील कोलामानजिक व त्याच्या शेताच्या बाजुलाच ११ घरांची वस्ती थाटली होती. सर्व काही सुरळीतपणे चालत असताना जमापुंजी खर्च करून उभारलेल्या कुडा-मातीच्या घरात त्यांचे मनही रमले होते. मात्र या सुखी संसाराला आरक्षणाची कीड लागली अन् क्षणार्धात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. काही तासातच घर असलेली कुटुंबे बेघर झाली. पोलिसांच्या साक्षीने आपला बिºहाड जुनी वस्ती सेवादासनगरमध्ये हलविला. पण राहायचे कुठे हा प्रश्न पडला असताना त्यांचे नातलग त्यांच्या मदतीला धावून आले आणि आपल्याच गुराच्या गोठ्यात राहण्यासाठी आश्रय दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता विदारक स्थिती बघायला मिळाली. आपली व्यथा सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाही. एकीकडे चुल तर त्याच शेजारी मुल घेऊन चिंतेत पडलेल्या कुटुंबातील माणसं बसली होती. धनराज आडे, विश्वनाथ आडे, रघुनाथ आडे, वैजनाथ आडे, प्रभु जाधव, उत्तम जाधव या ग्रामस्थांनी ‘लोकमत’जवळ व्यथा मांडली.जगण्यासाठी संघर्ष सुरूचसेवादासनगर येथून तेलंगणाच्या कोलामानजिक जाऊन शेती करणे आम्हाला खूप कठीण झाले होते. पावसाळ्यात तर खूप त्रास व्हायचा. कधी-कधी तर अंधारही व्हायचा. आम्ही घरी येईपर्यंत आमची मुले उपाशी राहायची. त्यामुळे आम्ही शेतालगत घरे उभारून जगण्याचा निर्णय घेतला होता. जगण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा होता की आमचे नशीबच फुटके होते माहित नाही. गेली अनेक वर्ष भटंकती करण्यात गेली. आजही भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशा शब्दात आपली करूण कहानी गावकºयांनी सांगितली.अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारया गावचे सरपंच विमल राठोड, जि.प. सदस्य कमल राठोड तसेच पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्याशी चर्चा केली असता प्रेमनगरातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असून त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.