शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘चांदा ते बांदा’ या म्हणीचा असा झाला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:01 IST

भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते.

ठळक मुद्देचांदा म्हणजे आताचे चंद्रपूर : चांदा ते बांदा नावाने शासनाची योजनाही आली

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते. आता, चांदा आणि बांदा ही दोन शहर नेमकी कुठे व त्या शहरांचा नवीन जुना इतिहास काय, हे जाणून घेउ या! चांदा अर्थात चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुखालय असलेले शहर विदर्भात, राज्याच्या एका टोकाला तेलंगणा सीमेच्या जवळ आहे. गोंडवंशीय राजांनी या भागावर सुमारे ६०० वर्षे राज्य केले. बल्लारशाह (बल्लारपूर) चा शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर बसविले. या शहराचे प्रारंभीचे नाव चंद्रपूर तसेच चांदागढ असे होते. पुढे चांदा आणि १९६४ ला चंद्रपूर असे नाव झाले. पण चंद्रपूर सोबतच या शहराला लाडाने व प्रेमाने चांदा असे ही बरेच ठिकाणी म्हटले जाते.जिल्ह्याचे मुख्यालय, राजकीय घडामोडीचे केंद्र, मंत्र्यांचे शहर, औद्योगिक नगरी तसेच येथील महाकाली व अंचलेश्वर महादेव मंदिर असल्याने धार्मिक स्थळ तसेच जुन्या शहराभोवतीचे मजबूत परकोट आणि त्याला चार दिशांना चार मोठे दरवाजे असे चांदाचे वैशिष्टये आहे.बांदा हे शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील कोकण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे ऐतिहासिक शहर तेरखोल या नदीकाठी वसले आहे. पंधराव्या शतकात या शहराचे मोठे नाव होते. राजकीय घडामोडीच्या या शहराचे पूर्वी नाव होते आदिलाबाद! छत्रपती शिवाजी महाराजांनी तो भाग आदिलशहाकडून हिसकावला आणि आदिशहा हे नाव बदलवून बांदा असे नाव ठेवले. त्या भागात मराठी, मालवणी व कोकणी भाषा बोलली जाते. बंदेश्वर मंदिर व भूमिका मंदिर ही तेथील श्रद्धास्थान आहेत. तेथील किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी इतिहासाच्या बरेचशा खाणाखुणा तेथे आहेत. चांदा आणि बांदा ही दोन्ही शहर परस्परविरूद्ध दिशेला व एकमेकापासून हजारो किलोमीटर लांब आहेत. राज्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत उल्लेख करण्याकरिता या दोन शहराचा ‘चांदा ते बांदा’असा उल्लेख केला जातो. एकंदरीत, चांदा ते बांदा ला या निमित्ताने मोठे नाव आणि महत्व मिळाले, आहे हे उल्लेखनीय!या दोन शहरांची निवड का?या दोन शहरांची नावे खूप छोटी, दोन अक्षरी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची शेवटची अक्षरे यमकात छान जुडतात. ते उच्चारायला सोपी आणि ऐकायलाही छान वाटतात. आणि ही दोन्ही शहरे राज्याच्या टोकावर आहेत. त्यामुळे या शहरांची निवड केली असावी. कारण कोणतेही असो, या निमित्ताने या शहरांची नावे प्रसिध्द झाली आहेत. राजकारणी भाषणातून चांदा ते बांदा असे हमखास म्हणत असतात. महाराष्ट्र राज्यातील मागास जिल्ह्यातील विकासाकरिता राज्यशासनाने नुकतीच एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेलाही ‘चांदा ते बांदा’ असे नाव देण्यात आले आहे.