शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांनंतरही मौलझरी तलाव अपूर्ण

By admin | Updated: May 21, 2017 00:31 IST

येथून ३० किलोमीटर अंतरावर लाखो रुपये खर्च करून मौलझरी तलावाचे बांधकाम करण्यात आले.

५५० शेतकरी वंचित : पावसाळ्यानंतर सिंचनासाठी मिळणार पाणी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथून ३० किलोमीटर अंतरावर लाखो रुपये खर्च करून मौलझरी तलावाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, ४५ वर्षे झाल्यानंतर ते काम अद्याप अपूर्ण आहे. तेव्हापासून ५५० शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. आता चंद्रपूर पाटबंधारे विभागाने पुन्हा हे काम हाती घेतले असून पावसाळ्यानंतर त्यातून तीन गावांमधील ५५० शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.१९७२ मध्ये मौलझरी लघु पाटबंधारे तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. ते काम १९८३मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु या तलावाच्या बंधाऱ्यातून पाझर होत असल्याने पाणी वाहून जाते. तलावाच्या धरणपाळी खालून पाण्याची गळती होते. या तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या गावातील शेतकऱ्यांना वारंवार केली होती. सिंचनाची दुसरी कोणतीही सोय नसल्याने जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे तलाव दुरूस्तीसाठी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तलावातून सिंचनाची पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.नागपूर येथील भूगर्भ वैज्ञानिकांनी तलावाच्या धरणाच्या पायव्यामध्ये कर्टन गाऊंटिंगची उपाययोजना करण्यात आली नसल्याने धरणपाळी खालून होणारी पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट केले होते. ती उपाययोजना करण्यात आल्यास पाणीसाठा तयार होणे शक्य असल्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणले होते. त्यावेळी जलसंपदा सचिवांनी कर्टन गाऊंटिंग करण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार, या तलावाची गळती थांबविण्याकरिता २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाने १ कोटी ५७ लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. त्यानंतर मार्च महिन्यापासून कर्टन गाऊंटिंगचे काम कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी सुरू केले आहे. तलाव गळती दुरूस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून आगामी पावसाळ्याचे पाणी तलावात जमा होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना सिंचन करता येणार आहे.ताडोबातील वन्य प्राण्यांनाही मिळणार पाणीमौलझरी तलावाची दुरूस्ती झाल्यावर पाणी गळती थांबणार आहे. त्यानंतर ४७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनरूज्जीवित होणार आहे. नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या गावांचा परिसर धान पिकांचे आहे. तलावातून सिंचनाचे पाणी मिळाल्यावर या परिसरात उत्पन्नात वाढ होईल. तसेच मत्स्योत्पादनातूनही शासनाला महसूल मिळणार आहे. हा तलाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे वाघ, अस्वल, हरीण, काळवीट आदी विविध वन्यप्राणी दृष्टीस पडत असतात. त्यांनाही वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होऊन नागरी परिसरात पाण्यासाठी धाव घ्यावी लागणार नाही.