शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गणित बिघडले

By admin | Updated: September 25, 2014 23:20 IST

मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने

युती तुटली : आघाडीही सुटलीचंद्रपूर : मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील राजकारणही प्रभावित होणार आहे. जिल्ह्यात सहा जागांपैकी प्रत्येकी तीन ठिकाणी काँग्रेस व भाजपाचे आमदार आहेत. आजवरच्या भाजपा-सेना युतीमध्ये वरोरा आणि राजुरा या दोन ठिकाणच्या जागा शिवसेनेच्या कोट्यात होत्या. त्यामुळे अन्य चार ठिकाणी तोलामोलाचे उमेदवार शिवसेनेला शोधावे लागणार आहेत. भाजपाने वरोरातून ओम मांडवकर यांचे नाव आधीपासूनच चालविले होते. तर राजुरामध्ये खुशाल बोंडे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजवरच्या आघाडीत सही जागा काँँग्रेसकडेच होत्या. या सर्व ठिकाणी काँग्रेस उमेदवारांची नावे जवळपास ठरली आहेत. गुरूवारी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत राजुरातून सुभाष धोटे, चिमूरमधून अविनाश वारजूकर आणि ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार ही नावे जाहीर झाली आहेत. उर्वारित तीन ठिकाणचे उमेदवारही जवळपास ठरल्यासारखे असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून ब्रह्मपुरीतून संदीप गड्डमवार तर, वरोरातून जयंत टेमुर्डे यांना उमेदवारी जाहीर झाल्यासारखी आहे. राजुरातून सुदर्शन निमकर यांचे नाव पक्षाकडे जवळपास पक्के होते. मात्र ऐन वेळी ते शिवसेनेत गेल्याने तिथे नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. बल्लारपूर, चिमूर आणि चंद्रपुरातही उमेदवारांचे नाव पक्के करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कुणी सावरले, कुणी हादरले !बदललेल्या राजकीय स्थितीमुळे जिल्ह्यातील राजकारणात प्रचंड फेरबदल दिसत आहेत. आघाडी- युती तुटल्याने कुणी सावरले आहेत, तर कुणी हादरले आहेत. चिमूरचे अविनाश वारजुकर यांचा संयम कामी आला. स्वतंत्र आघाडी करण्याच्या विचारात असलेल्या वारजुकरांना चिमुरातूनच हक्काची जागा मिळाली. विजय वडेट्टीवार यांचे अखेर ब्रह्मपुरीत स्थानांतरण झाले. राजुराचे सुदर्शन निमकर यांची स्थिती मात्र अवघड झाली आहे. राजुरातून राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनाच पक्के होते. मात्र, आघाडी भंग होणार नाही व राकॉचे तिकीट मिळणार नाही, असा समज करून ते शिवसेनेत प्रवेशले. नेमकी त्याच क्षणी आघाडी भंगली. अ‍ॅड. हर्षल चिपळूणकर यांना बल्लारपुरातून तिकीट हवे होते. पूर्वी राष्ट्रवादीच्या, नंतर प्रहार संघटनेच्या आणि त्यानंतर काँंगे्रसच्या राजकीय व्यासपिठावर दिसणाऱ्या अ‍ॅड. चिपळूणकर ऐन वेळी बल्लारपूरचे तिकीट घेऊन मनसेच्या मंचावर प्रगटल्या आहेत. मात्र काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून तिकीटावर लढण्याचे त्यांचे स्वप्न बदललेल्या राजकारणाने भंगले आहे. भाजपाचे चंद्रपुरातील नेते किशोर जोरगेवार यांना चंद्रपुरातून तिकीट हवे आहे. येथे भाजपाचे विद्यमान आमदार नाना श्यामकुळे दावेदार आहेत. मात्र अद्याप कसलीही घोषणा नाही. त्यामुळे जोरगेवारांना अजूनही अपेक्षा आहे. वरोरा तालुक्यातील लाल पोथरा कालवा पाणी संघर्ष समितीचे ओम मांडवकर वर्षभरापूर्वी भाजपात आले. युती होणार की तुटणार, अशा द्विधा मनस्थितीत त्यांची संभाव्य उमेदवारीही डावावर लागलेली असतानाच युती तुटली. सहाजिकच त्यांचा भाजपाच्या तिकीटावरून लढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.