शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: March 18, 2015 01:20 IST

खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

चंद्रपूर : खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाचे अनुदानासाठी ठरवलेले निकष शेतकऱ्यांसाठी गळचेपी ठरत असल्याने नुकसान होऊनही जिल्ह्यातील शेतकरी मात्र शासकीय मदतीस अपात्र ठरले आहेत.रबी हंगाम ऐन हातात आलेला असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशावर पाणी फेरले. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू पिक वादळामुळे जमीनीवर झोपले. तर कापूस पिकांचे बोंड पावसामुळे काळे पडले. हरभरा पिकालाही माती लागल्याने त्याची पत घसरली. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले. मात्र या सर्व्हेक्षणात नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्के पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत.शासनाच्या निकषानुसार नुकसान भरपाईसाठी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्या आत आली आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल याची कोणतीही आशा नाही. तसे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने नुकसान होऊनही शासनाच्या आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असल्याचे शेतकरी आजही कसे जगावे, या विवंचनेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कृषी विभाग म्हणतो, नुकसान निरंकयावर्षी रबी पिकांना अवकाळी पावसाचा फटका चार ते पाच वेळा बसला असला तरी, यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. नुकसानीचा अहवाल निरंक असून शासनाकडून मदत मिळेल अशी कोणतीच अपेक्षा नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.फक्त तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या नजरअंदाज अहवालात फक्त तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात चंद्रपूर तालुक्यात हरभरा पिकाचे ७० हेक्टरवर नुकसान व गहू पिकाचे २२५ हेक्टरचे नुकसान, ब्रह्मपुरी तालुक्यात हरभराचे १५९ हेक्टर व गहू पिकाचे ७७ हेक्टर व इतर पिकाचे ३२०७ हेक्टर तर सिंदेवाही तालुक्यात हरभरा पिकाचे ३० हेक्टरवर व गहू पिकाचे २५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ही टक्केवारी ५० च्या आत आहे.वीज पडून दोन गायी ठारसोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारडी येथे घडली. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भास्कर राऊत यांच्या दोन गायींवर वीज पडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले असून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.