शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: March 18, 2015 01:20 IST

खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

चंद्रपूर : खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाचे अनुदानासाठी ठरवलेले निकष शेतकऱ्यांसाठी गळचेपी ठरत असल्याने नुकसान होऊनही जिल्ह्यातील शेतकरी मात्र शासकीय मदतीस अपात्र ठरले आहेत.रबी हंगाम ऐन हातात आलेला असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशावर पाणी फेरले. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू पिक वादळामुळे जमीनीवर झोपले. तर कापूस पिकांचे बोंड पावसामुळे काळे पडले. हरभरा पिकालाही माती लागल्याने त्याची पत घसरली. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले. मात्र या सर्व्हेक्षणात नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्के पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत.शासनाच्या निकषानुसार नुकसान भरपाईसाठी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्या आत आली आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल याची कोणतीही आशा नाही. तसे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने नुकसान होऊनही शासनाच्या आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असल्याचे शेतकरी आजही कसे जगावे, या विवंचनेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कृषी विभाग म्हणतो, नुकसान निरंकयावर्षी रबी पिकांना अवकाळी पावसाचा फटका चार ते पाच वेळा बसला असला तरी, यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. नुकसानीचा अहवाल निरंक असून शासनाकडून मदत मिळेल अशी कोणतीच अपेक्षा नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.फक्त तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या नजरअंदाज अहवालात फक्त तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात चंद्रपूर तालुक्यात हरभरा पिकाचे ७० हेक्टरवर नुकसान व गहू पिकाचे २२५ हेक्टरचे नुकसान, ब्रह्मपुरी तालुक्यात हरभराचे १५९ हेक्टर व गहू पिकाचे ७७ हेक्टर व इतर पिकाचे ३२०७ हेक्टर तर सिंदेवाही तालुक्यात हरभरा पिकाचे ३० हेक्टरवर व गहू पिकाचे २५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ही टक्केवारी ५० च्या आत आहे.वीज पडून दोन गायी ठारसोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारडी येथे घडली. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भास्कर राऊत यांच्या दोन गायींवर वीज पडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले असून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.