शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: March 18, 2015 01:20 IST

खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

चंद्रपूर : खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाचे अनुदानासाठी ठरवलेले निकष शेतकऱ्यांसाठी गळचेपी ठरत असल्याने नुकसान होऊनही जिल्ह्यातील शेतकरी मात्र शासकीय मदतीस अपात्र ठरले आहेत.रबी हंगाम ऐन हातात आलेला असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशावर पाणी फेरले. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू पिक वादळामुळे जमीनीवर झोपले. तर कापूस पिकांचे बोंड पावसामुळे काळे पडले. हरभरा पिकालाही माती लागल्याने त्याची पत घसरली. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले. मात्र या सर्व्हेक्षणात नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्के पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत.शासनाच्या निकषानुसार नुकसान भरपाईसाठी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्या आत आली आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल याची कोणतीही आशा नाही. तसे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने नुकसान होऊनही शासनाच्या आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असल्याचे शेतकरी आजही कसे जगावे, या विवंचनेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कृषी विभाग म्हणतो, नुकसान निरंकयावर्षी रबी पिकांना अवकाळी पावसाचा फटका चार ते पाच वेळा बसला असला तरी, यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. नुकसानीचा अहवाल निरंक असून शासनाकडून मदत मिळेल अशी कोणतीच अपेक्षा नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.फक्त तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या नजरअंदाज अहवालात फक्त तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात चंद्रपूर तालुक्यात हरभरा पिकाचे ७० हेक्टरवर नुकसान व गहू पिकाचे २२५ हेक्टरचे नुकसान, ब्रह्मपुरी तालुक्यात हरभराचे १५९ हेक्टर व गहू पिकाचे ७७ हेक्टर व इतर पिकाचे ३२०७ हेक्टर तर सिंदेवाही तालुक्यात हरभरा पिकाचे ३० हेक्टरवर व गहू पिकाचे २५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ही टक्केवारी ५० च्या आत आहे.वीज पडून दोन गायी ठारसोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारडी येथे घडली. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भास्कर राऊत यांच्या दोन गायींवर वीज पडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले असून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.