शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

माता महाकाली यात्रेला प्रारंभ

By admin | Updated: March 26, 2015 00:51 IST

चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून १७ अधिकाऱ्यांसह २०० पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत.बुधवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूरचे गोंडराजचे विरेंद्रशहा राजे चंद्रशहा आत्राम यांचा राजवाडा समाधी वार्ड, चंद्रपूर येथून गोंडी नृत्याच्या गजरात वाजत गाजत गोंडराजांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गांधी चौक मार्गे अंचलेश्वर मंदिरात पोहचली. त्यानंतर शंभु शेक दर्शन घेऊन महाकाली मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आराध्य देवता माता महाकालीची गोंड संस्कृतीप्रमाणे गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या हस्ते पुजाविधी कार्यक्रम गोंडराजे समाज सुधारक समितीतर्फे करण्यात आले. श्रीरावण इनवाते यांच्या हस्ते गोंडी धर्म रितीरिवाजाप्रमाणे ही पूजाअर्चना झाली. गोंडराजे समाज सुधारक ट्रस्ट, राणी हिराई प्रतिष्ठाण, मुळ भारतीय आदिवासी कृती संघटना चांदागड यांनी या मिरवणूकीचे आयोजन केले होते.यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसरात चोख व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडचणी येऊ नये यासाठी, रांगेत बांबू बांधून त्यामधूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे. ही यात्रा एक महिना चालणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संघटनांनीही सरसावल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)शहर वाहतुकीत बदल यात्रेदरम्यान शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतुकीत बदल केला आहे. जिल्हा परिषद मार्गावरून जटपुरा गेट मार्गे जाणारी तसेच रामाळा तलाव मार्गे जटपुरा गेटकडे येणारी चारचाकी वाहने सरळ कस्तुरबा मार्गे मौलाना आझाद चौकातून, आझाद बगीचाच्या बाजुने लिंक रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपुरा गेटमधून बाहेर पडतील. तसेच बांगला नगर, महाकाली वॉर्ड, भिवापूर वॉर्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नानागरिकांनी शहरात जाणेस किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वॉर्ड मार्ग या रस्त्याचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बांगला चौक हा मार्ग सायकल व्यतिरीक्त सर्व वाहनांकरिता बंद राहणार असल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी आदेश काढले आहे.