शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माता महाकाली यात्रेला प्रारंभ

By admin | Updated: March 26, 2015 00:51 IST

चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून १७ अधिकाऱ्यांसह २०० पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत.बुधवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूरचे गोंडराजचे विरेंद्रशहा राजे चंद्रशहा आत्राम यांचा राजवाडा समाधी वार्ड, चंद्रपूर येथून गोंडी नृत्याच्या गजरात वाजत गाजत गोंडराजांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गांधी चौक मार्गे अंचलेश्वर मंदिरात पोहचली. त्यानंतर शंभु शेक दर्शन घेऊन महाकाली मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आराध्य देवता माता महाकालीची गोंड संस्कृतीप्रमाणे गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या हस्ते पुजाविधी कार्यक्रम गोंडराजे समाज सुधारक समितीतर्फे करण्यात आले. श्रीरावण इनवाते यांच्या हस्ते गोंडी धर्म रितीरिवाजाप्रमाणे ही पूजाअर्चना झाली. गोंडराजे समाज सुधारक ट्रस्ट, राणी हिराई प्रतिष्ठाण, मुळ भारतीय आदिवासी कृती संघटना चांदागड यांनी या मिरवणूकीचे आयोजन केले होते.यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसरात चोख व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडचणी येऊ नये यासाठी, रांगेत बांबू बांधून त्यामधूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे. ही यात्रा एक महिना चालणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संघटनांनीही सरसावल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)शहर वाहतुकीत बदल यात्रेदरम्यान शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतुकीत बदल केला आहे. जिल्हा परिषद मार्गावरून जटपुरा गेट मार्गे जाणारी तसेच रामाळा तलाव मार्गे जटपुरा गेटकडे येणारी चारचाकी वाहने सरळ कस्तुरबा मार्गे मौलाना आझाद चौकातून, आझाद बगीचाच्या बाजुने लिंक रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपुरा गेटमधून बाहेर पडतील. तसेच बांगला नगर, महाकाली वॉर्ड, भिवापूर वॉर्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नानागरिकांनी शहरात जाणेस किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वॉर्ड मार्ग या रस्त्याचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बांगला चौक हा मार्ग सायकल व्यतिरीक्त सर्व वाहनांकरिता बंद राहणार असल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी आदेश काढले आहे.