शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST

आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्थिक हतबलता : वरोऱ्यात तीन लाख क्विंटल कापूस तर नागभीड येथे ५० हजार क्विंटल धान खरेदी

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे. शनिवारपर्यंत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन लाख पाच हजार ७६ क्विंटल कापूस, तर नागभीड समितीमध्ये ४८ हजार ८५२ क्विंटल धान खरेदी झाली. शेतमालास जादा भाव मिळेल, या हेतूने काही शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला. पण, ही संख्या कमीच आहे. सोयाबीन, कापूस आणि धानाला समाधानकारक भाव मिळत नसला, लोकांची देणी फे डून कर्जाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आता पर्यायच उरला नाही.नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, मूल तालुक्यांमध्ये या हंगामात धानाची सर्वाधिक लागवड करण्यात आली. यंदा पावसाने सुरुवातीलाच दगा दिला त्यामुळे रोवणीची वेळ निघून गेली. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकºयांनी पावसाची प्रतिक्षा करून हैराण झाले होते. हंगाम टळेल, या भितीने अनेक शेतकºयांनी कशीबशी रोवणी उरकविली. पावसाचा अभाव आणि विविध किडींनी धान पिकावर हल्ला केल्याने एकरी उत्पादकता घटली. त्याचा जोरदार फटका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च आणि वर्षभरातील कुटुंबाचा ताळमेळ कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला. शासनाने शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. पण, त्यातही कटकटी वाढवून ठेवल्या. या वर्षी पाऊस उशीरा आल्यामुळे शेतमाल बाजारात निराशा पसरली होती. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये खरेदीला सुरुवात झाली नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चूरणे केल्याने आता धान्य विक्रीला वेग आल्याचे दिसून येत आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये ५४ हजार ११५ क्विंटल धान खरेदी झाली. गेल्या वर्षी खरेदीने उच्चांक गाठला होता. ब्रह्मपुरीत २०० क्विंटल धान्याची आवक झाली असून, मूल बाजार समितीमध्ये शनिवारपर्यंत ४० हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. सिंदेवाही बाजार समितीमध्ये केवळ एक हजार क्विंटल धान्य खरेदी केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठशेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केले. यंदा पहिल्यांदाच आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. शेतमाल विक्रीकरिता सात व अन्य कागदपत्रांच्या अट लागू केल्याने शेतकरी दुरावले. परिणामी, शेतमाल खरेदी केंद्राला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या अल्प आहे.लूट होण्याचा धोकारबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण, खरीप हंगामात अल्प उत्पादन झाले. त्यातून लागवडीचा खर्चही हाती येणार की नाही, या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकल्यानंतर लगेच चुकारे मिळतात, या आशेने शेतकरी शेतमाल विकत आहेत. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापारी व बाजार समित्यांवर चौकशी समित्या पाठवून संभाव्य लुटेला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक खरेदीकोरपना बाजार उत्पन्न समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. नाफेडतर्फे २९५ क्विंटल खरेदी झाली असून, २ हजार ५०० ते ३ हजार ६२ रुपये प्रती क्विंटल भाव सोयाबिनला दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम मिळत असल्याने बरेच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.