शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST

आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्थिक हतबलता : वरोऱ्यात तीन लाख क्विंटल कापूस तर नागभीड येथे ५० हजार क्विंटल धान खरेदी

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे. शनिवारपर्यंत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन लाख पाच हजार ७६ क्विंटल कापूस, तर नागभीड समितीमध्ये ४८ हजार ८५२ क्विंटल धान खरेदी झाली. शेतमालास जादा भाव मिळेल, या हेतूने काही शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला. पण, ही संख्या कमीच आहे. सोयाबीन, कापूस आणि धानाला समाधानकारक भाव मिळत नसला, लोकांची देणी फे डून कर्जाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आता पर्यायच उरला नाही.नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, मूल तालुक्यांमध्ये या हंगामात धानाची सर्वाधिक लागवड करण्यात आली. यंदा पावसाने सुरुवातीलाच दगा दिला त्यामुळे रोवणीची वेळ निघून गेली. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकºयांनी पावसाची प्रतिक्षा करून हैराण झाले होते. हंगाम टळेल, या भितीने अनेक शेतकºयांनी कशीबशी रोवणी उरकविली. पावसाचा अभाव आणि विविध किडींनी धान पिकावर हल्ला केल्याने एकरी उत्पादकता घटली. त्याचा जोरदार फटका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च आणि वर्षभरातील कुटुंबाचा ताळमेळ कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला. शासनाने शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. पण, त्यातही कटकटी वाढवून ठेवल्या. या वर्षी पाऊस उशीरा आल्यामुळे शेतमाल बाजारात निराशा पसरली होती. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये खरेदीला सुरुवात झाली नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चूरणे केल्याने आता धान्य विक्रीला वेग आल्याचे दिसून येत आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये ५४ हजार ११५ क्विंटल धान खरेदी झाली. गेल्या वर्षी खरेदीने उच्चांक गाठला होता. ब्रह्मपुरीत २०० क्विंटल धान्याची आवक झाली असून, मूल बाजार समितीमध्ये शनिवारपर्यंत ४० हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. सिंदेवाही बाजार समितीमध्ये केवळ एक हजार क्विंटल धान्य खरेदी केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठशेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केले. यंदा पहिल्यांदाच आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. शेतमाल विक्रीकरिता सात व अन्य कागदपत्रांच्या अट लागू केल्याने शेतकरी दुरावले. परिणामी, शेतमाल खरेदी केंद्राला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या अल्प आहे.लूट होण्याचा धोकारबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण, खरीप हंगामात अल्प उत्पादन झाले. त्यातून लागवडीचा खर्चही हाती येणार की नाही, या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकल्यानंतर लगेच चुकारे मिळतात, या आशेने शेतकरी शेतमाल विकत आहेत. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापारी व बाजार समित्यांवर चौकशी समित्या पाठवून संभाव्य लुटेला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक खरेदीकोरपना बाजार उत्पन्न समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. नाफेडतर्फे २९५ क्विंटल खरेदी झाली असून, २ हजार ५०० ते ३ हजार ६२ रुपये प्रती क्विंटल भाव सोयाबिनला दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम मिळत असल्याने बरेच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.