शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST

आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्थिक हतबलता : वरोऱ्यात तीन लाख क्विंटल कापूस तर नागभीड येथे ५० हजार क्विंटल धान खरेदी

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे. शनिवारपर्यंत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन लाख पाच हजार ७६ क्विंटल कापूस, तर नागभीड समितीमध्ये ४८ हजार ८५२ क्विंटल धान खरेदी झाली. शेतमालास जादा भाव मिळेल, या हेतूने काही शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला. पण, ही संख्या कमीच आहे. सोयाबीन, कापूस आणि धानाला समाधानकारक भाव मिळत नसला, लोकांची देणी फे डून कर्जाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आता पर्यायच उरला नाही.नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, मूल तालुक्यांमध्ये या हंगामात धानाची सर्वाधिक लागवड करण्यात आली. यंदा पावसाने सुरुवातीलाच दगा दिला त्यामुळे रोवणीची वेळ निघून गेली. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकºयांनी पावसाची प्रतिक्षा करून हैराण झाले होते. हंगाम टळेल, या भितीने अनेक शेतकºयांनी कशीबशी रोवणी उरकविली. पावसाचा अभाव आणि विविध किडींनी धान पिकावर हल्ला केल्याने एकरी उत्पादकता घटली. त्याचा जोरदार फटका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च आणि वर्षभरातील कुटुंबाचा ताळमेळ कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला. शासनाने शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. पण, त्यातही कटकटी वाढवून ठेवल्या. या वर्षी पाऊस उशीरा आल्यामुळे शेतमाल बाजारात निराशा पसरली होती. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये खरेदीला सुरुवात झाली नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चूरणे केल्याने आता धान्य विक्रीला वेग आल्याचे दिसून येत आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये ५४ हजार ११५ क्विंटल धान खरेदी झाली. गेल्या वर्षी खरेदीने उच्चांक गाठला होता. ब्रह्मपुरीत २०० क्विंटल धान्याची आवक झाली असून, मूल बाजार समितीमध्ये शनिवारपर्यंत ४० हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. सिंदेवाही बाजार समितीमध्ये केवळ एक हजार क्विंटल धान्य खरेदी केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठशेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केले. यंदा पहिल्यांदाच आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. शेतमाल विक्रीकरिता सात व अन्य कागदपत्रांच्या अट लागू केल्याने शेतकरी दुरावले. परिणामी, शेतमाल खरेदी केंद्राला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या अल्प आहे.लूट होण्याचा धोकारबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण, खरीप हंगामात अल्प उत्पादन झाले. त्यातून लागवडीचा खर्चही हाती येणार की नाही, या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकल्यानंतर लगेच चुकारे मिळतात, या आशेने शेतकरी शेतमाल विकत आहेत. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापारी व बाजार समित्यांवर चौकशी समित्या पाठवून संभाव्य लुटेला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक खरेदीकोरपना बाजार उत्पन्न समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. नाफेडतर्फे २९५ क्विंटल खरेदी झाली असून, २ हजार ५०० ते ३ हजार ६२ रुपये प्रती क्विंटल भाव सोयाबिनला दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम मिळत असल्याने बरेच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.