शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

नियोजनाअभावी अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित

By admin | Updated: July 5, 2014 23:31 IST

शासनाच्या निर्देशाला डावलून शिक्षण विभागाने खासगी शाळांवर वक्रदृष्टी ठेवली आहे. अनेक खासगी शाळांना या विभागाने पुस्तकेच पुरविली नसल्याने विद्यार्थ्यांवर पुस्तकाविनाच शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

तळोधी (बा) : शासनाच्या निर्देशाला डावलून शिक्षण विभागाने खासगी शाळांवर वक्रदृष्टी ठेवली आहे. अनेक खासगी शाळांना या विभागाने पुस्तकेच पुरविली नसल्याने विद्यार्थ्यांवर पुस्तकाविनाच शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.बालकाचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्ग १ ते ५ व वर्ग ६ ते ८ या वर्गाला पुर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचा दर्जा दिला गेला आहे. वर्ग १ ते ८ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटपाची जबाबदारी शासनाने स्वत:कडे घेतली आहे. व यानुसार कोणताही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही किंवा त्याच्या शिक्षणाची प्रतारणा करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे संकेत आहेत. त्यामुळेच वर्ग १ ते ५ ची पुस्तके सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे ही शासनाच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाची प्राथमिक जबाबदारी आहे. पंरतु शिक्षण विभागातील अडेलतट्टू अधिकाऱ्यांनी काही खासगी शाळातील वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच दिली नाही. त्यामुळे त्या शाळातील वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकाचा आधार घेऊन किंवा पुस्तकाविना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.संबंधित खासगी शाळातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता पंचायत समितीकडील पुस्तकाचा साठा संपला असून ज्याठिकाणी जि.प. शाळामध्ये ४ था वर्ग होता, त्या वर्गाच्या पटसंख्येनुसार पुस्तके देण्यात आली आहे.आपण ५ वा वर्ग का सुरू केला, असा उरफाटा प्रश्न करीत आपणाला यावर्षी पुस्तके मिळणार नाही, अशा प्रकारची उत्तरे दिली जात आहे. वर्ग ५ वी व ८ वी ची पुस्तके बाजारात उपलब्धही नाही. त्यामुळे सदर खासगी शाळातील विद्यार्थ्यांवर पुस्तकाविनाच शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थी जुनी पुस्तके शोधत फिरत आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे. (वार्ताहर)