शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

जिल्ह्यातील अनेक नळयोजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST

गोबर गॅस झाले नामशेष चंद्रपूर : ग्रामीण भागात शेतीयुक्त जनावरांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. शेणाचा तुटवडा जाणवू लागल्याने ...

गोबर गॅस झाले नामशेष

चंद्रपूर : ग्रामीण भागात शेतीयुक्त जनावरांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. शेणाचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील कुुटुंबांसाठी इंधनाची व्यवस्था म्हणून गोबर गॅस उपयुक्त ठरत होते. मात्र, सुधारित तंत्रज्ञानाच्या प्रसाराने आधुनिक काळात यंत्रावरील शेती प्रचलित झाली आहे. त्यामुळे गोबर गॅस नामशेष झाले आहे.

नामफलक लावण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा, विदर्भा, इरई, झरपट आदी नद्या वाहतात. परंतु, या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणा-या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे या नद्यांच्या नावाचा फलक लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी द्यावा

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ आहे.

अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

नांदाफाटा : गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

पांदण रस्त्यांवरून भांडणे

घुग्घुस : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शीव आता संकटात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खतांच्या किमती कमी कराव्या

चंद्रपूर : रासायनिक खतांच्या किमती वाढविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खतांच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे

सावली : तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले. सावली शहरात येताना अडचणींचा सामना करावा लागतो. अपघाताचा धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवावे

चंद्रपूर : कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जाते. त्यामुळे कुटुंबांचे पालन पोषण करताना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनच्या काळामध्येही चोखपणे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे कचरा संकलकांचे वेतन वाढवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.