शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वादळाने अनेक घरांची पडझड

By admin | Updated: April 28, 2015 01:17 IST

काल रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे राजुरा तालुक्यातील अन्नुर, अंतरगाव

विरुर (स्टे.) : काल रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे राजुरा तालुक्यातील अन्नुर, अंतरगाव व खांबाडा येथील सुमारे ३० घरांची पडझड झाली. तसेच अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील १५ ते २० विजेचे खांब व झाडे कोलमडून पडली. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा काल खंडित होता.राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या गाव परिसरात काल सायंकाळी वादळासह जोरदार पाऊस झाला. अन्नुर अंतरगाव येथील वसंता येलमुले, राजाराम लेटकरी, प्रमोद कुळसंगे, गणपत सिडाम, विठ्ठल खेकारे, राजम गोगुलवार यांच्यासह अनेकजणांच्या घरांची पडझड झाली. तसेच सहा विजेचे खांब, विजेची डिपी व घराची पडझड झाल्याने जनावरांना दुखापत झाली. खांबाडा येथील अप्पाजी तुकाराम बाबुलकर, सुरेश शालिकराव चव्हाण, अंकुश दिगांबर वडस्कर, यांच्याही घरांची पडझड झाली. घरांचे टिनपत्रे उडून अंगावर पडल्याने अजय सुरेश चव्हाण, फुलाबाई वडस्कर, गौरुदास वडस्कर हे जखमी झाले. अनेक घरांचे छप्परे, कवेलू, टिनपत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील १५ ते २० विजेचे खांब व झाडे कोलमडून पडली. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रात्रभर अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला.घटनेची माहिती होताच राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, तहसीलदार, पटवारी यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली. एक तास चाललेल्या या वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)