शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीबरोबरच आघात केला. त्यामुळे बदलत्या काळानुसार जगण्याचा आटापिटा करावा लागत आहे. रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेत असलेले सर्वसामान्य कुटुंंब होरपळून निघत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आता पाच महिने होत आहेत. या काळात लॉकडाऊन झाल्याने विविध राज्यात रोजगारासाठी गेलेली जनता तिथेच अडकली होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा तडाखा : आठवडी बाजार बंद झाल्याने बुडाला रोजगार

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : कोरोना विषाणूचा पाच महिन्यापासुन जिल्ह्यात कहर सुरू आहे. त्यामुळे गरीबांचे हाल होत आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्या हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. लहान व्यावसायिकांना ग्रामीण भागातील आठवडी बाजारांचा मोठा आधार होता. जिल्हा प्रशासनाने बाजार बंद केल्याने ेअनेकांनी अनेकांना आपला मूळ व्यवसाय बदलविला. विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती थोडी बरी होती त्यांनी नवीन व्यवसाय स्वीकारला. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे विक्रेते आज ना उद्या आठवडी बाजार सुरू होईल या आशेवर मिळेल ती कामे करीत आहेत.कोरोना विषाणूने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीबरोबरच आघात केला. त्यामुळे बदलत्या काळानुसार जगण्याचा आटापिटा करावा लागत आहे. रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेत असलेले सर्वसामान्य कुटुंंब होरपळून निघत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आता पाच महिने होत आहेत. या काळात लॉकडाऊन झाल्याने विविध राज्यात रोजगारासाठी गेलेली जनता तिथेच अडकली होती. कठीण प्रसंगातुन आपल्या मूळगावी आली खरी मात्र रोजगाराचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने गहू व तादुंळ मोफत दिले. परंतु, अन्नासाठी लागणारे तेल, तिखट व भाजीपाला घेण्यासाठी पैसे लागतात. कोरोनामुळे अशा उपेक्षित, वंचित घटकांचा रोजगार हिरावला. व्यवसायच ठप्प झाल्याने किराणा सामान व भाजीपाला कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध प्रकारच्या घरगुती वस्तू विक्री करणाऱ्या किरकोळ विके्रत्यांचा रोजगार हिरावला. ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे त्यांनी पर्यायी व्यवसाय शोधला. पण, त्यामध्ये जम बसविणे दूरच राहिले. या हंगामी व्यवसायातून काही दिवस ढकलता आले तरी मोठा आधार आहे, अशी व्यथा विक्रेत्यांनी व्यक्त केली.भाजी विकणाऱ्यांचीच संख्या अधिककोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी प्रशासनाने केवळ जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला विक्रीलाच परवानगी दिली आहे. त्यामुळे आठवडी बाजारात प्लास्टीक वस्तू, लोखंडी अवजारे, हॉटेल, चहा विक्री करणारे बेरोजगार झाले. उदरनिर्वाहासाठी पर्याय शोधला नाही तर कुटुंबाचे हाल होतील, या भितीपोटी जुन्या व्यवसायाचा माल घरीच गुंडाळून ठेवला आणि शहरातील वार्डावार्डात फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. तालुकास्थळावरील विक्रेत्यांनाच हे शक्य झाले. मात्र, खेड्यातील लहान विक्रेत्यांच्या व्यवसायाचे बंद झाले आहेत.पोटाची भूक की आरोग्य?भाजीपाला व्यतिरिक्त इतर किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे दिसून येते. ‘घरी सामान आहे मात्र विकू शकत नाही’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ‘पोटाची भूक की आरोग्य’ या संकटात सर्वसामान्य सापडले आहेत. गावात फिरून किरकोळ व्यवसाय करण्यास ३१ आॅगस्टनंतर तरी परवानगी मिळेल, याकडे विक्रेत्यांच्या नजरा लागल्या.लघु उद्योग बंद कामगार बेरोजगारलॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम गटातील ३ हजार २८६ लघु व्यवसाय सुरू होते. यामध्ये १ लाख ६६१ लोकांना रोजगार मिळत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जिल्हा व राज्यबंदी लागू झाल्याने लघु उद्योगांची चाके थांबली. ७५ टक्के कामगारांना रोजगार नाही. कामच नसल्याने मिळेल ती कामे करून गाडा हाकावा लागत आहे.रोजगाराअभावी कुटुंबीय तणावातआर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे आठवडी बाजारातील अनेकांकडे भांडवल नाही. भांडवल जमविले तर अन्य गावात फिरून व्यवसाय करण्याची परवागनी नाही. फेरीवाले, कापड विक्रेते, लोखंडी अवजारे, शेतकºयांना लागणाºया दैनंदिन वस्तू, उदीळ, मूग, चवळी, धने, तूर, जवस, मोट, हरभरा दाळ, तूर दाळ, पोपटी, वाल, आदी कडधान्ये विकून उदरनिर्वाह करणाºया लहान व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. रोजगार बुडाल्याने शेकडो कुटुंबिय आर्थिक तणावात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय