शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

माणिकगड पहाडावर नांदू लागली शांतता !

By admin | Updated: April 19, 2015 01:15 IST

सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह,

जिवती : सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह, परिसरात वाढत जाणारी गुन्हेगारी, चोरी, बलात्कार, खून आदी प्रकारामुळे जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले होते. दारूबंदीनंतर १५ दिवसांतच जीवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर शांतता नांदू लागल्याचे चित्र दिसत असून परिसरातील महिला यामुळे समाधानाचे जीवन जगत आहे. गावात कुठलाही समारंभ असला की, हौसेने दारू पिऊन बँड, डिजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईला आवरणे कठिण होऊन बसले होते. नाचण्याच्या कार्यक्रमामुळे विवाहाला विलंब होतच होता.सोबत भांडणेही होत असत. दारूबंदीनंतर हा प्रकार कमी झाला आहे. दारूमुळे परिसरात होणाऱ्या विकास कामासाठी मजुरही मिळत नव्हते. गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेकजण मद्यप्राशन करून भांडण-तंटे करत असत. पहाडावर सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवश्यावर शेती करावी लागते. त्यात वर्षानुवर्षे निसर्गाचा फटका बसत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. त्यातून त्यांची व्यसनाधिनताही वाढत होती. त्यातून अशाप्रकारे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेक महिलांचे सौभाग्य हरविले. काहींनी तरुण पणातच आपला जीव गमावला. दारूमुळे महत्त्वाची कामे तर सोडाच पण संसार व पोटच्या गोळ्याकडेही लक्ष देण्याचे भान त्यांना राहत नसे. चांगले संस्काराअभावी भावी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी केलेल्या दारूबंदीच्या मागणीची दखल घेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात दारूबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यसनाधिनतेला आळा बसण्यासाठी मदत होत आहे. दारूमुळे कंटाळलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. दारूमुळे उद्ध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)