शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

माणिकगड पहाडावर नांदू लागली शांतता !

By admin | Updated: April 19, 2015 01:15 IST

सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह,

जिवती : सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह, परिसरात वाढत जाणारी गुन्हेगारी, चोरी, बलात्कार, खून आदी प्रकारामुळे जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले होते. दारूबंदीनंतर १५ दिवसांतच जीवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर शांतता नांदू लागल्याचे चित्र दिसत असून परिसरातील महिला यामुळे समाधानाचे जीवन जगत आहे. गावात कुठलाही समारंभ असला की, हौसेने दारू पिऊन बँड, डिजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईला आवरणे कठिण होऊन बसले होते. नाचण्याच्या कार्यक्रमामुळे विवाहाला विलंब होतच होता.सोबत भांडणेही होत असत. दारूबंदीनंतर हा प्रकार कमी झाला आहे. दारूमुळे परिसरात होणाऱ्या विकास कामासाठी मजुरही मिळत नव्हते. गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेकजण मद्यप्राशन करून भांडण-तंटे करत असत. पहाडावर सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवश्यावर शेती करावी लागते. त्यात वर्षानुवर्षे निसर्गाचा फटका बसत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. त्यातून त्यांची व्यसनाधिनताही वाढत होती. त्यातून अशाप्रकारे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेक महिलांचे सौभाग्य हरविले. काहींनी तरुण पणातच आपला जीव गमावला. दारूमुळे महत्त्वाची कामे तर सोडाच पण संसार व पोटच्या गोळ्याकडेही लक्ष देण्याचे भान त्यांना राहत नसे. चांगले संस्काराअभावी भावी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी केलेल्या दारूबंदीच्या मागणीची दखल घेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात दारूबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यसनाधिनतेला आळा बसण्यासाठी मदत होत आहे. दारूमुळे कंटाळलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. दारूमुळे उद्ध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)