शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

‘एका मनस्विनीचे चिंतन’ डोळ्यात अंजन घालणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:30 IST

जया द्वादशीवार यांनी महाराष्टष्ट्रच्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन केले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘चिंतन एका मनस्विनीचे’ ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

ठळक मुद्दे डॉ. जया द्वादशीवार यांच्या ग्रंथाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धर्म व जातीने विखुरलेल्या समाजव्यवस्थेला विधायक वळण देण्याचे काम राजकारण्यांसाठी तसे कठीण असते. लेखक विचारवंतच हे काम अगदी निष्ठेने करू शकतात. विवेकी लेखक मंडळी सत्तेला उभे करतात आणि कोसळवू शकतात. जया द्वादशीवार यांनी महाराष्टष्ट्रच्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन केले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘चिंतन एका मनस्विनीचे’ ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडलेल्या समारंभाप्रसंगी मंचावर डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंंदा आमटे, साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट, डॉ. श्रीकांत तिडके, सत्कारमूर्ती सेवाग्राममधील नई तालिमच्या संचालक सुषमा शर्मा, आनंदवनचे ज्येष्ठ रूग्णसेवक डॉ. बाबा पोळ आदी उपस्थित होते.माजी गृहमंत्री शिंदे म्हणाले, डॉ. जया द्वादशीवार यांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी इतकी संवेदनशिल होती याची मी कल्पनाही करू शकत नाही. ‘चिंतन एका मनस्विनीचे’ या पुस्तकातून देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक घटना आणि साहित्य कलाकृतींची अत्यंत गांभिर्याने चिकित्सा केली आहे. महाराष्ट्रला लेखक-पत्रकारांची फार मोठी परंपरा लाभली आहे. राजकीय नेतृत्व चुकत असेल तर त्यांचे कान धरण्याचे काम पत्रकारांचे आहे. जयातार्इंनी आमच्या सोलापूर जिल्ह्यातील डॉ. किशोर शांताबाई काळे, डॉ. शरणकुमार लिंबाळे या दोन लेखकांच्या पुस्तकांचीही आपल्या ग्रंथात दखल घेतली. त्यांचे लेखन सतत प्रेरणा देणारे आहे. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नवीन पिढीला जयातार्इंच्या नावाने पुरस्कार देण्याची परंपरा निर्माण केली. या पुरस्कारातून नव्या पिढीला सेवा कार्याची उब मिळणार आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोलापूर येथून मी चंद्रपुरात आलोय. माझा दिवस वाया गेला नाही. या कार्यक्रमातून मी प्रेरणा घेऊ न चाललो आहे, असेही माजी गृहमंत्री शिंदे म्हणाले. द्वादशीवार कुटुंबीयांतर्फे डॉ. प्रकाश आमटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, संचालन माधवी भट यांनी केले. नंदू नागरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश गांधी, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी खासदार नरेश पुगलिया, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, राजुराचे नगराध्यक्ष अरूण धोटे, डॉ. रजनी हजारे, शोभा पोटदूखे, डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, अरूणा सबाने आदींसह चंद्रपूर व नागपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.जमिनीवर पाय ठेवणारी लेखिकाजया द्वादशीवार यांच्या ग्रंथावर विनोद शिरसाठ व डॉ. श्रीकांत तिडके यांनी भाष्य केले. समग्र लेखन अत्यंत प्रगल्भ विचारांचे निदर्शक असून माहिती व भाष्य यातून जयातार्इंचे चिंतन सुरू होते. ‘जमिनीवर पाय ठेवणारी लेखिका’ अशी नोंद शिरसाट यांनी केली. लेखनात विविधता आहे. यातील साहित्य व समीक्षा अर्धविराम नाही तर पूर्णविराम आहे. बा. सी. मर्ढेकरांचा लयसिद्धांत लेखिकेने मान्य केला आहे. स्त्री लेखिकांची अभिव्यक्ती, आशय कडक असावी. मराठी स्त्री साहित्यात धीटपणा नाही, असा निष्कर्ष लेखिकेना मांडला तो वास्तवदर्शी असल्याचे डॉ. तिडके यावेळी म्हणाले.सेवावर्तींना पुरस्कार प्रदानमहात्मा गांधीप्रणित सेवाग्राम आश्रमात नई तालिम संकल्पनेनुसार मुलांना शिक्षण देणाऱ्या सुषमा शर्मा, आनंदवनचे ज्येष्ठ रूग्णसेवक डॉ. बाबा पोळ यांना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जया द्वादशीवार सेवा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रूपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रोटी फुड बँक चालविणारे राजु चोरिया यांना डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते रोख ५० हजार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मुल येथील महम्मद जिलानी यांना मानचिन्ह व वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला साड्या भेट देण्यात आल्या. सत्कारमुर्तींनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक