शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मनपाच्या डम्पिंग यार्डला भीषण आग

By admin | Updated: February 17, 2016 00:50 IST

येथील बल्लारपूर बायपास मार्गावरील मनपाच्या डम्पिंग यार्डला आग लागली. हा प्रकार दुपारी २ वाजतानंतर उघडकीस

चंद्रपूर : येथील बल्लारपूर बायपास मार्गावरील मनपाच्या डम्पिंग यार्डला आग लागली. हा प्रकार दुपारी २ वाजतानंतर उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच, महानगर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने आगीवर सुमारे पाच बंबातील पाण्याचा मारा केल्यानंतर दीड तासाने ही आग आटोक्यात आली. या घटनेने या डम्पिंग यार्डची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. महानगर पालिकेचा डम्पिंग यार्ड २० एकरमध्ये विस्तारला असून जवळपास १५ एकरवर कचऱ्याचे ढिगारे उभे आहेत. मनपाने कचरा उचलण्याचा ठेका एका कंपनीला दिला असून या कंपनीचे कामगारांकडून वॉर्डावॉर्डातून गोळा करतात. तो कचरा त्याच परिसरातील एका विशिष्ट कचराकुंडीत साठविल्या जातो. त्यानंतर वाहनाद्वारे तो कचरा डम्पिंग यार्डवर नेऊन टाकला जातो. मात्र गंभीर बाब ही की, या डंपींग यार्डवर पाहिजे तशी सुरक्षा व्यवस्था नाही. विशेष म्हणजे या डम्पिंग यार्डला कुंपण लावण्यात आले आहे. मात्र तरीही या भागातील काही रहिवाशांनी कुंपण तोडून डम्पिंग यार्डमधून ये-जा सुरू केली आहे. यातून एखादवेळी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजची घटनादेखील अशातून (प्रतिनिधी)अंतुर्ला गावात झाडाला आगघुग्घुस: येथून जवळच असलेल्या अंतुर्ल गावातील एका झाडाला आग लागली. अग्निशामक दलाने आग विझविली. मात्र दुसऱ्याही दिवशी पुन्हा त्याच झाडाला आग लागली. त्यामुळे हा विषय नागरिकांसाठी कुतूहलाचा ठरला आहे. सोमवारी पहाटे या गावातील लोकवस्तीतील एका झाडाला आग लागली. ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिक भयभीत झाले. याबाबत माहिती मिळताच जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी अंतुर्ला गाव गाठले व एसीसीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळविले. मंगळवारी सकाळी पुन्हा त्याच झाडाला आग लागली आणि आजही अग्निशमन दलाच्या मदतीने ती विझविण्यात आली. सदर घटनेबाबत नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी एका मंदिराचे बांधकाम करण्यासाठी चबुतरा तयार केला आहे. मात्र मंदिराचे काम न झाल्यानेच हा आगीचा प्रकार घडल्याची अफवा पसरविली जात आहे.घनकचरा कचऱ्याचा प्रश्न गंभीर२० एकर परिसरात असलेल्या डम्पिंग यार्डमध्ये आज घडीला. पाच लाख टन कचरा आहे. त्यातील केवळ दिड ते दोन लाख टन घनकचरा आहे. उर्वरित माती व इतर कचरा आहे. या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगर पालिकेकडून सशक्त कंत्राटदाराचा शोध घेतला जात आहे. मात्र घनकचऱ्याच्या विल्हेवाटीची प्रक्रिया अतिशय किचकट आणि खर्चिक असल्याने कंत्राटदारच सापडत नसल्याची माहिती आहे.