शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

देशमुखगुड्यात मलेरियाने विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: August 19, 2015 01:21 IST

तालुक्यात सध्या आठवडाभरापासून मलेरिया आजाराने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णत: कुचकामी ठरली आहे.

जिवती: तालुक्यात सध्या आठवडाभरापासून मलेरिया आजाराने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णत: कुचकामी ठरली आहे. तालुक्यापासून १२ किमी अंतरावर असलेल्या देशमुखगुडा येथील अंजना शिवशंकर दुधभाते (१३) या विद्यार्थीनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ही मुलगी हिमायतनगर जिल्हा परिषद शाळेतील सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नगराळा, जोळणघाट, मांगगुडा, तर पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कोलांडी, टिटवी, खडकी, रायपूर, आंबेझरी, नंदप्पा या गावात मलेरियाची साथ सुरू झाली आहे. तालुक्यात दोनच प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथेही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक रुग्ण गडचांदूर राजुरा तसेच चंद्रपूरला उपचारासाठी जात आहेत. पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले. मात्र अनेक गावात फवारणी झाली नाही. यामुळे हिवतापाला आमंत्रण देणाऱ्या डासांचे प्रमाण वाढले आहे. ज्या देशमुखगुड्यात हिवतापाने अंजना मृत पावली, तेथे विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. तसेच येथील पाण्याची चाचणीसुद्धा करण्यात आली नाही.(शहर प्रतिनिधी)सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा अपयशीतालुक्यात जिवती आणि पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याकेंद्रातंर्गत पुडियाल मोहदा, नगराळा, नोकेवाडा, लांबोरी, भारी, शेणगाव, नंदप्पा, हिरापूर आणि पुनागुडा येथे उपकेंद्र आहेत. परंतु याठिकाणी कर्मचारी वेळोवेळी उपस्थित न राहिल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. गावागावांत जाऊन कर्मचाऱ्यांनी भेटी द्यायला पाहिजे. पण असे होत नसल्याने आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. जिवती तालुका अनेक गावे आहेत. मात्र या तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची सोय झाली नाही.तालुक्याला आता ग्रामीण रुग्णालय शासनाने मंजूर केले आहे पण ते सुरु होणार कधी? असा नागरिकांचा प्रश्न आहे.