शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

By admin | Updated: October 19, 2015 01:30 IST

आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला.

सुधीर मुनगंटीवार : मार्गदर्शन कार्यशाळेत केले आवाहन चंद्र्रपूर : आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला. आदर्श ग्राम गाव योजनेंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील निवडण्यात आलेली २७ गावे पहिल्या टप्प्यात आदर्श करण्याचा आपण सर्वशक्तिनिशी प्रयत्न करू. जलयुक्त शिवार योजना, मनरेगा यासारखी कामे मोठया प्रमाणात लोकसहभागातून केली जाऊ शकतात. प्रत्येक कामासाठी निधी आवश्यकच आहे असे नाही. संस्कार व इतर कामे हे निधीशिवाय गावात होऊ शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंत:करणापासून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्या आदर्श ग्राम मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, हरीश शर्मा, भास्कर थेरे पाटील, यशदाचे संचालक सुमेध गुर्जर, साधनव्यक्ती रामलाल काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, अल्का लोणकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहिते आदींची प्रामुख्?याने उपस्थित होते.कार्यशाळेत बोलताना मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श गाव योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २७ गावांशी संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पेयजल तसेच शेतीसाठी पाणी या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी गावागावांत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावाचा भौतिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तसेच मानसिक विकास करण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातूनच आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यातील २७ गावे हे राज्यातील इतर जिल्हयांसाठी मार्गदर्शक ठरावी, यादृष्टीने आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)