शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

By admin | Updated: October 19, 2015 01:30 IST

आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला.

सुधीर मुनगंटीवार : मार्गदर्शन कार्यशाळेत केले आवाहन चंद्र्रपूर : आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला. आदर्श ग्राम गाव योजनेंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील निवडण्यात आलेली २७ गावे पहिल्या टप्प्यात आदर्श करण्याचा आपण सर्वशक्तिनिशी प्रयत्न करू. जलयुक्त शिवार योजना, मनरेगा यासारखी कामे मोठया प्रमाणात लोकसहभागातून केली जाऊ शकतात. प्रत्येक कामासाठी निधी आवश्यकच आहे असे नाही. संस्कार व इतर कामे हे निधीशिवाय गावात होऊ शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंत:करणापासून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्या आदर्श ग्राम मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, हरीश शर्मा, भास्कर थेरे पाटील, यशदाचे संचालक सुमेध गुर्जर, साधनव्यक्ती रामलाल काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, अल्का लोणकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहिते आदींची प्रामुख्?याने उपस्थित होते.कार्यशाळेत बोलताना मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श गाव योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २७ गावांशी संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पेयजल तसेच शेतीसाठी पाणी या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी गावागावांत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावाचा भौतिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तसेच मानसिक विकास करण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातूनच आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यातील २७ गावे हे राज्यातील इतर जिल्हयांसाठी मार्गदर्शक ठरावी, यादृष्टीने आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)