शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

क्रांतीनगरीतील मुख्य मार्ग घेणार मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मोठे वाहन तसेच बाजारात येणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर-वरोरा मुख्य मार्गावर भरणारा आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत भरविण्याविषयी नगर परिषदेत ठराव घेण्यात आला. ...

ठळक मुद्देपालिकेचा करार : कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरणार आठवडी बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मोठे वाहन तसेच बाजारात येणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर-वरोरा मुख्य मार्गावर भरणारा आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत भरविण्याविषयी नगर परिषदेत ठराव घेण्यात आला. त्यावर बाजार समितीने सहमती दर्शवली. पालिकेच्या मासिक सभेत काही अटी शर्तीसह बाजार भरविण्यास सहमती दर्शविण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे.चिमूर नगर परिषद स्थापन होण्यापुर्वीपासून आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत आहे. ग्रामपंचायत काळात बाजार तलावात भरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे पुन्हा बाजार मुख्य रस्त्यावरच भरविण्यात आला. यामुळे रहदारीस होणाºया अडथळ्यामुळे तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पालिकेने सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत बाजार भविण्याविषयी एक मताने ठराव पारित केला. हा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला. बाजार समितीनेही अनुकुलता दर्शवली व तसे पत्र पालिकेला दिले. या पत्रावर १० एप्रिलला झालेल्या मासिक सभेत चर्चा करून करार करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीचिमूर शहराचे नागरिकीकरण झाले असून लोकसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून मुख्य रस्त्याला चौपदरी करण्यात येवून फुटपाथ व नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र फुटपाथवर अतिक्रमण वाढल्याने सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.या आहेत अटी व शर्तीसभेतील निर्णयाप्रमाणे उपलब्ध केलेल्या जागेसाठी भाडे तत्वावर दरमहा ३० हजार रुपये द्यावे, मूत्रिघर, वीज, पिण्याचे पाणी व स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेची राहील, समितीने बाजाराकरिता जागा समतल करून द्यावे, किमान दोन वर्षांचा करार करण्यात येईल, मात्र भाडे दरमहा देण्यात येईल, समितीने तयार करून दिलेल्या खड्यातच कचºयाची विल्हेवाट लावली जावी. बाजाराचा कर नगर परिषदेने ठरविलेला ठेकेदारच वसूल करेल, या अटींचा समावेश करारात आहे.