शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीजींचे चंद्रपूर आणि बल्लारपुरात झाले होते भव्य स्वागत !

By admin | Updated: October 2, 2015 05:55 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दोनदा चंद्रपूरला तसेच एकदा बल्लारपूरला येऊन गेलेत. चंद्रपूरला ते प्रथम ४ फेब्रुवारी १९२७ ला आले

वसंत खेडेकर ल्ल बल्लारपूरराष्ट्रपिता महात्मा गांधी हे दोनदा चंद्रपूरला तसेच एकदा बल्लारपूरला येऊन गेलेत. चंद्रपूरला ते प्रथम ४ फेब्रुवारी १९२७ ला आले होते. त्याप्रसंगी त्यांचे चंद्रपुरात जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागत समितीत विश्वनाथ दीक्षित आणि खुशालचंद खजांची यांचा समावेश होता. युवक, आबाल वृद्ध,महिला- पुरुषांनी त्यांचे दर्शन घेतले. त्यांचे भाषण ऐकले.यावेळी गांधीजींनी स्वदेशाचा संदेश आपल्या भाषणातून दिला होता. त्यानंतर महात्मा गांधी १७ नोव्हेंबर १९३३ ला परत चंद्रपुरात आले होते. गांधी चौकात त्यांची विशाल जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी युवकांना राष्ट्रभक्तीचा संदेश देऊन चेतविले. याच सभेत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे पिता देवाजी बापू खोब्रागडे यांचेही भाषण झाले. गांधीजींच्या या आगमनानंतर व त्यांनी दिलेल्या जोशपूर्ण संदेशानंतर चंद्रपूरच्या युवकांनी स्वतंत्रता आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.गांधीजी हे कुठेही रेल्वेनेच प्रवास करीत असत. दिल्ली- वर्धा, बल्लारशाह या मार्गाने मद्रासकडे जाताना रेल्वे गाडी एंजिनात कोळसा आणि पाणी भरण्याकरिता बल्लारशाह (बल्लारपूर) या रेल्वेस्थानकावर बराच वेळ थांबत असे. गांधीजी दक्षिण भारतात याच मार्गाने जात. गाडी बल्लारशाह स्थानकावर थांबली की गांधीजी तेवढ्या वेळात डब्याच्या दारावर येऊन थांबत आणि त्यांना बघण्याकरिता जमा झालेल्या लोकांचे अभिवादन हात जोडून स्वीकारत! एकदा मात्र बल्लारशाह रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मवर त्यांच्या भाषणाचा आणि स्वागताचा कार्यक्रम काँग्रेस कमेटीने आयोजित केला. फलाटावर त्याकरिता मंडपही उभारला गेला होता. गांधीजी सेवाग्रामहून मद्रासला तेथील हिंदी भाषा संमेलनात भाग घेण्याकरिता याच मार्गाने गेले होते. संमेलनातून परत येताना ते बल्लारशाह रेल्वे स्थानकावर उतरले. चंद्रपूर तसेच बल्लारपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताकरिता मोठ्या संख्येने जमले होते. गाडीतून गांधीजी खाली उतरताच गोपिकाताई कन्नमवार (चंद्रपूर) आणि प्रमिलाबाई याज्ञिक (बल्लारपूर) या दोघींनी त्यांच्या कपाळावर तिलक कुंकू लावून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच राष्ट्र सेवा दलाने त्यांना सलामी दिली. गांधीजी स्थानापन्न झाल्यानंतर सामूहिक प्रार्थना झाली. गांधीजींनी राष्ट्रप्रेम आणि हिंदी भाषेचा सन्मान यावर भाषण दिले. तेथे उपस्थित असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या पोशाखावर आरएसडी (राष्ट्रीय सेवा दल) असे लिहिले होते. ते बघून त्याचा अर्थ गांधीजींनी कार्यकर्त्यांना विचारला. इंग्रजीत लिहिलेले हे शब्द देवनागरी (हिंदी) मध्ये लिहिण्याची सूचना तेथे उपस्थित असलेल्या सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्याना दिली. गांधीजींच्या या कार्यक्रमात काँग्रेस कमेटीचे पं. भगवती प्रसाद मिश्र, मा.सां. कन्नमवार, याज्ञीक, सेवा दलाचे गजानन आक्केवार, तद्वतच गांधीजींच्या नावाने भारावून गेलेले बल्लारपूर येथील युवक नंदगिरवार, माकोडे, दवे, डुडुरे, खेडेकर, खटोड, तर्रीवार, गोनीवार, मुरकुटे, मारपल्लीवार, रामराव, रेड्डी, खोब्रागडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.