शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

Maharashtra Election 2019 ; कमी मतदान झालेल्या क्षेत्राची वाढविणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देमागे वळून पाहताना : सहा विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात चंद्रपूर पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक इतिहासात चंद्रपूर क्षेत्रात २०१४ पर्यंत सर्वाधिक कमी मतदान झाले होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जागृतीपर विविध उपक्रम सुरू करण्यात आले.२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ चिमूर मतदार संघ ७४.५५ टक्के, राजुरा ७०.८३ टक्के, वरोरा ६४.८१ टक्के, बल्लारपूर ६३.१८ तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा मतदार संघ ५४.०७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १८ लाख ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झाली आहे. एक लाख १३ हजार मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारांच्या वाढीत २२ मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये नऊ लाख ६० हजार ७२७ पुरुष तर नऊ लाख १८ हजार ९३८ महिला मतदारांचा समावेश आहे. २०१९ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सहा मतदार संघात एकूण ६६.५० टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा मतदार संघात ६९.६१ टक्के, बल्लारपूर ६४.१६ टक्के, वरोरा ६३.३५ टक्के, चंद्रपूर ५३.१० टक्के, चिमूर ७३.५२ टक्के, ब्रह्मपुरी ७५.२७ टक्के मतदान झाले होते. आकडेवारी बघितल्यास चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी इतर मतदार संघाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले. जागृतीपर विविध उपक्रम व अभियानाच्या माध्यमातून शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता गावागावांत संबंधीत यंत्रणा कार्य करीत आहे.महाविद्यालयांवर लक्ष केंद्रीतचंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यापूर्वी विशेष प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्याच्या पाच विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत कमी मतदान झाले. खरे तर या क्षेत्रात चंद्रपूर शहराशी संबंधीत असणारी शेकडो गावे आहेत. शहरातील नवीन विचारांचा परिणाम युवक-युवतींवर होणे अपेक्षित होते. मात्र, उलट प्रकार दिसून आला. यंदा हे चित्र बदलू शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर