शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात शेतकरी हिताची कामे केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी करण्यासाठी झालेली कामे असे अनेक कामे केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस । भांगडियांच्या प्रचारार्थ भिसी येथे जाहीर सभा

चिमूर : आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी करण्यासाठी झालेली कामे असे अनेक कामे केली. आतापर्यंत साडेतीन लाख कुटुंबातील नागरिकांना पट्टे देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.चिमूर तालुक्यातील भिसी येथे आयोजित भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार मितेश भांगडिया, उमेदवार बंटी भांगडिया, वसंत वारजूकर, डॉ. श्याम हटवादे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख धर्मसिह वर्मा, जितेंद्र मोटघरे, दिगंबर गुरपुडे, माजी सभापती राजू झाडे, डॉ. दीपक यावले, बंडू नाकाडे, प्रकाश वाकडे, प्रा. विजय टिपले, अशोक कामडी, डॉ. देवनाथ गंधरे, बंडू जावळेकर, पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील मोजक्याच आमदारातील एक असे कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांचे वर्णन करता येईल. ते कधी स्वत:चे काम घेऊन आले नाही. परंतु चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी, निधीसाठी, विकास योजनांसाठी शंभरदा आले आणि सर्वाधिक निधी आणून चिमूर क्षेत्रातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे निर्माण केले. अशा दिवसरात्र काम करणाºया बंटी भांगडिया यांना पुन्हा एकदा आमदार बनवा, पुन्हा नवीन विकास दिसेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :chimur-acचिमूर