शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

Maharashra Election 2019 ; चंद्रपूरला देशातील मॉडेल जिल्हा बनवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून मार्गी लावण्यात आले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांची ग्वाही : पाच वर्षांत भाजप सरकारची दमदार कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील ५ वर्षांत महायुतीच्या सरकारने दमदार कामगिरी करीत राज्य विकासाच्या बाबतीत आघाडीवर नेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले. विकास हेच भाजप सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे विचाराला व विकासाला नागरिकांनी मतदान करावे आणि महायुतीला सत्तेत आणावे, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मागील पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात केलेल्या विकासाचा लेखाजोखा सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडला.शेतीवर खर्च, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना झालेला फायदा, कर्जमाफी, सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची सुटका, सिंचन प्रकल्पावरील झालेला खर्च, ग्रामीण भागातील आवास योजना, सडक योजना, जलयुक्त शिवार, पांदण रस्ते, स्टार्टप योजना, वीज निर्मिती क्षमतेत वाढ, वन्यजिवांमुळे झालेल्या नुकसानीला वाढीव अर्थसहाय्य, राज्यातील वृक्ष लागवड अशा अनेक विकासकामांची यादीच सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दाखविली.२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून मार्गी लावण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती दिली. राज्यातील एकूण २२ हजार ५९० गावांत जलयुक्त शिवारची सहा लाख ९ हजार १८ कामे पूर्ण केली. यासाठी सात हजार ६९२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला. आघाडी सरकारच्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरांसाठी ९५ हजारांचे अनुदान दिले जात होते. युती सरकारने दीड लाख केले. ३२ हजार ६२८ किमीचे पांदण रस्ते तयार केले. यासारख्या अनेक योजना भरपूर निधी देत योग्यरितीने राबविल्या, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार त्यांनी दिली.यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिºहे, आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.बल्लारपूर ते नागपूर लोकल ट्रेनपुढच्या पाच वर्षांच्या नियोजनात आम्ही बल्लारपूर ते नागपूर लोकल शटल टेÑन सुरू करून नागरिकांना स्वस्त दरात प्रवास उपलब्ध करणार आहोत. यात वेळ आणि पैशाहीची बचत पण होणार, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.विरोधकांकडून मतदारांची दिशाभूलकाँग्रेस-राकाँ नेते खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. सत्ता असताना त्यांना जे जमले नाही ते महायुतीच्या सरकारने करून दाखविले. २००९ मध्ये सुशिलकुमार शिंदे यांनी कर्ज माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर ते विसरले. आघाडी सरकारची कर्जमाफी शुद्ध धूळफेक होती. असत्य बोलण्याचा नोबेल पुरस्कार ठेवला तर त्याचे मानकरी काँग्रेस, राकाँचे नेतेच असतील, असाही टोला यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर