शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

महानुभाव साहित्य म्हणजे समाजहिताचाच विचार

By admin | Updated: December 13, 2014 22:35 IST

महानुभाव साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री आहे. याबाबत वाद करण्यात काहीच अर्थ नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या प्राचिन साहित्याला धोका निर्माण झाला. त्यामुळे हे साहित्य टिकावे

६४ वे विदर्भ साहित्य संमेलन : महानुभाव साहित्य हीच खरी मराठी साहित्याची गंगोत्रीराजेश पाणूरकर - चक्रधर स्वामी साहित्य नगरीतूनमहानुभाव साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री आहे. याबाबत वाद करण्यात काहीच अर्थ नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या प्राचिन साहित्याला धोका निर्माण झाला. त्यामुळे हे साहित्य टिकावे म्हणून महानुभावी साहित्यिकांनी सांकेतिक भाषेत हे साहित्य निर्माण केले. सांकेतिक भाषा नंतरच्या काळात उपयोगात आणल्याने महानुभाव साहित्याच्या काळाबाबत वाद होत असले तरी हे साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री असल्याचा सूर शनिवारच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. विदर्भ साहित्य संघ, तळोधी आणि श्री गोविंदप्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी ‘महानुभाव साहित्य हीच खरी मराठी साहित्याची गंगोत्री’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महंत न्यायंबासबाबा शास्त्री तर वक्ते म्हणून डॉ. सतीश तराळ, डॉ. श्याम मोहोरकर, डॉ. वसुधा वैद्य उपस्थित होते. महंत न्यायंबासबाबा शास्त्री अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले, महानुभाव साहित्याची प्रेरणा फसविल्या गेलेल्या समाजाला विधायकतेकडे नेणारी आहे. समाजाच्या हितासाठी असते ते खरे साहित्य. महानुभाव साहित्य किती प्राचीन आहे, हा वादाचा मुद्दा असू शकतो पण महानुभाव साहित्यात किती मूलगामी लेखन आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. समाजाला विकारशून्य करण्याचा प्रयत्न महानुभाव साहित्याने केले. गुन्हे घडतात, बलात्कार होतात आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत कारण त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचत नाही. नऊ रसांपैकी सर्व रस साहित्यात असतात पण शांत रस माणसाला जीवनाचा हेतू सांगणारा आहे. स्वामींचा काळ आपण गृहित धरला तर शके ११४३ हा त्यांचा अवतारकाळ मानला जातो. त्यामुळे मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्रच आहे. यासंदर्भात कोलतेंचे संशोधन आहे. हा काळ अधिक मागे नेता येतो पण या वादात न पडणेच योग्य आहे, असे ते म्हणाले. स्वामींनी त्या काळात जी वैचारिक आणि सामाजिक क्रांती केली, त्याला तोड नाही. अन्यथा आपली संस्कृतीच टिकली नसती. स्वामींनी पाया भरला म्हणून त्यानंतर अनेक चळवळी होऊ शकल्यात, हे त्याचे महत्व आहे. हे साहित्य निर्माण झाले नसते तर आज आपण मस्जिदीत राहिलो असतो, असे महंतांनी स्पष्ट केले. विवेकसिंधु नव्हे लिळाचरित्रच प्राचीनश्याम मोहोरकर म्हणाले, महानुभाव साहित्याचा प्रारंभ ११ व्या शतकातच झाला, याचे अनेक पुरावे आहेत. पण मुकुंदराज यांचा विवेकसिंधु हा आद्यग्रंथ असल्याचे बोलले जाते. पण मुकुंदराजांनी मराठीचा दुबळा विचार मांडला. त्यांच्या जन्माबाबतही संशोधकांमध्ये एकमत नाही. अज्ञान आणि अडाणी लोकांची भाषा मराठी आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. ज्ञानदेवांनी मराठीबाबत जे ‘अमृताहुनी पैजा जिंके’ म्हटले त्याला उत्तर देताना मुकुंदराजांनी दिलेले उत्तर वाईट आहे. भाषेत रसाळपणा आणून तिला अलंकृत करुन भाषा नागविली जाते, असे त्यांचे मत होते. ते मराठीचे आद्यकवी कसे होतील. त्यामुळेच मराठी साहित्याची गंगोत्री महानुभाव साहित्यच आहे, असे मोहोरकर म्हणाले. डॉ. वसुधा वैद्य म्हणाल्या, महानुभाव साहित्याचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. या साहित्याचा शोधच अद्याप लागलेला नाही. बरेच साहित्य अप्रकाशित असून तत्पुर्वीच कुठल्या निष्कर्षावर पोहोचणे चुकीचे ठरेल. महानुभाव साहित्याशिवाय मराठीचा विचारही करता येत नाही कारण महानुभाव साहित्य हाच साहित्याचा मुख्य प्रवाह आहे, असे त्या म्हणाल्या. सांकेतिक लिपीमुळे प्रसार कमीडॉ. सतीश तराळ म्हणाले, महानुभाव साहित्य अमरावती आणि चांदुरबाजारच्या बोलीभाषेत लिहिले गेले आहे. सांकेतिक लिपित ते असल्याने आपल्यापर्यंत पोहचले नाही. त्याचा आता अभ्यास सुरु आहे आणि महानुभाव साहित्य प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. ज्ञानेश्वरी हा आपण आद्यग्रंथ मानला तर लिळाचरित्र त्याच्या १२ वर्षे आधी लिहिलेला आहे. केवळ ७ ग्रंथापुरते हे साहित्य मर्यादित नाही. त्यामुळे मराठी साहित्याची गंगोत्री महानुभाव साहित्यच असल्याचे मत त्यांनी मांडले. या परिसंवादाचे संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले.