शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

महाआॅनलाईनने ६० लाख रुपये बुडविले

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर

आॅपरेटर्स वेतनापासून वंचित : ११ कर्मचाऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशाराराजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना मागील अडीच वर्षांपासून पगारच मिळाला नाही. या कर्मचाऱ्याचे वेतन ६० लाख रुपये होत असून ते बुडण्याची दाट शक्यता आहे. परिणामी येथील कर्मचारी पंकज गाडे यांनी त्वरित वेतन अदा न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ‘लोकमत’शी बोलताना दिला. महाआॅनलाईन कंपनीच्या प्रकल्प प्रबंधकांनी २ आॅक्टोबर २०११ ला परशुराम प्रधाने, पंकज गाडे, करुणा चिकाटे, आसमा सय्यद, वर्षा मडावी, विनोद जाधव, आशिष बावनवाडे, महेंद्र चौधरी, विठ्ठल ढोरे, दुर्गा मोटघरे, ख्वाजा शेख या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले. तेव्हा हे सर्व कर्मचारी नियमीतपणे सावली, राजुरा, कोरपना, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती तहसील कार्यालयात डाटा एन्ट्रीचे काम मागील अडीच वर्षांपासून करीत आहे. परंतु अजुनपर्यंत त्यांना मानधन मिळालेले नाही. शासनाने ‘आम आदमी विमा योजना’ व विशेष सहाय्य योजनांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम महाआॅनलाईन लिमिटेड ही राज्य शासन आणि डाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस यांची राज्य शासनाच्या अधिकाराखालील स्थापन केलेली संयुक्त कंपनी आहे. संगणक चालक आऊटसोर्सींच्या तत्त्वावर नियुक्त करून या कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात काम करून घेतले. परंतु या कर्मचाऱ्यांचे मानधन जवळपास ६० लाख रुपये अजुनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून त्वरित मानधन देण्याची मागणी पंकज गाडे सह सर्व कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (शहर प्रतिनिधी)