शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महाकालीची ओढ लागली जीवाला...

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत.

५० वर्षांपासून वारी : भोपाळ, नांदेड, बीड, परभणी, तेलंगणाचे भक्त दर्शनाला आतूरचंद्रपूर : नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. या भाविकांच्या गर्दीमुळे महाकाली मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. माता महाकालीची अंतर्मनात भक्ती असून डफड्याच्या तालावर आपल्याच नादात जाणारे भक्त लक्ष वेधून घेत आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करुनही चेहऱ्यावर जराही थकवा न दिसणारे मराठवाड्यातील भाविक या भक्तीमेळ्यात आनंदाचे बीज पेरून जातात. नांदेड येथून गेल्या ३५ वर्षांपासून महाकालीच्या दर्शनासाठी येणारे परसराम बामणे म्हणाले की, महाकालीचे आपल्यावर लक्ष असल्याने वयाच्या ३५ व्या वर्षीपासून नियमीत यात्रेला येतो. त्यामुळे आपण मागीतलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. व महाकाली मातेला भेटण्याचा आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले. चंद्रपूरची यात्रा पूर्वी पंधरा दिवस ते पाऊण महिना चालायची. मात्र ही वैभवी यात्रा अलिकडे आठवड्यावर आली आहे. प्रवासाची साधने वाढल्याने भाविक खाजगी वाहनाने येतात. दर्शन झाल्यावर रात्रभर थांबून परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे अलिकडच्या काळात यात्रेचे दिवस कमी झाले असले तरी भक्तीचा पूर मात्र कायमच आहे. नांदेड जिल्ह्यातील चिकाळा तांडा येथून आलेले आनंदसिंग धनसिंग राठोड यांनी सांगितले की, मागील तीन वर्षापासून संपूर्ण परिवारासोबत गावच्या जवळपास ५० भाविकांसोबत मातेच्या दर्शनाला येतो. महाकाली मातेचे दर्शन केल्याने साक्षात देव भेटल्यासारखे वाटते. मनाला आनंद होतो. त्यामुळे याठिकाणी आठवडाभर संपूर्ण परिवारासोबत येथे वास्तव्यास राहत असतो.आनंदसिंग राठोड यांच्याप्रमाणे पहिल्याच वर्षी मातेच्या दर्शनासाठी आलेले परभणीचे अजय गुंडाळे यांनी जीवनार्च सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, यात्रेला येण्याचा पहिलाच वर्ष आहे. मात्र महाकाली यात्रेला आल्याने आनंद झाला. अनेक वर्षापासूनची दर्शन घेण्याची ईच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आता दरवर्षी महाकाली यात्रेला येण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या सुभाबाई सोपान सूर्यवंशी यांनी मातेच्या आशिर्वादाने सुखी संसार सुरू असल्याची माहिती दिली.परळी येथील सागरबाई बल्लाळ दोन दिवसांपासून महाकाली मंदिर परिसरात मुक्कामाला आहेत. महाकालीने त्यांची मनोकामना पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. मायेच्या वाटेला येताना १० वर्ष पूर्ण झाले आहेत. गावातील देवकरीण व परिसरातील भाविकांसोबत मायेच्या वाटेला येत असतो. त्यामुळे एकप्रकारचे समाधान लाभत असते. आजपर्यंत जे मागीतले त्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे नियमीत यात्रेला येत असते, असेही सागरबाई यांनी स्पष्ट केले. परळीचेच भरत जाधव म्हणाले की, मागील सात वर्षांपासून नियमित येत आहे. आठवडाभर मातेच्या चरणी राहत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होत असते. आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे दरवर्षी महाकाली यात्रेला येत असतो. (नगर प्रतिनिधी)दर्शनासाठी लागल्या रांगाचैत्र शुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधून झरपटच्या पात्रात पवित्र स्रान करण्याची देवी महाकालीच्या भक्तगणांची परंपरा आहे. या स्रानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग असते. कुटुंबातील बायकापोरांसह आणि वृद्धांसह आलेलेही अनेक जण यात सहभागी असतात. यंदा शुक्रवारी चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त आहे. अजूनही भाविकांचे जत्थे दाखल होणे सुरूच आहे. परिसरात घुमणारे पोतराजे आणि लयबद्धपणे वाजणाऱ्या डफड्यांमुळे हा परिसर सध्या २४ तास निनादतो आहे. यात्रेला नियमित येण्याचा संकल्पमध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून पहिल्यांदाच आलोक शर्मा महाकालीच्या दर्शनासाठी आले आहेत. त्यांचा महाकालीच्या यात्रेला येणाऱ्या हा पहिलाच अनुभव आहे. यात्रेला आल्याने दर्शन झाले. महाकालीच्या दर्शनानंतर त्यांच्या मनाला समाधान लाभले. त्यामुळे त्यांनी आता यात्रेला नियमित येण्याचा संकल्प केला आहे.