शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

महाकालीची ओढ लागली जीवाला...

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत.

५० वर्षांपासून वारी : भोपाळ, नांदेड, बीड, परभणी, तेलंगणाचे भक्त दर्शनाला आतूरचंद्रपूर : नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. या भाविकांच्या गर्दीमुळे महाकाली मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. माता महाकालीची अंतर्मनात भक्ती असून डफड्याच्या तालावर आपल्याच नादात जाणारे भक्त लक्ष वेधून घेत आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करुनही चेहऱ्यावर जराही थकवा न दिसणारे मराठवाड्यातील भाविक या भक्तीमेळ्यात आनंदाचे बीज पेरून जातात. नांदेड येथून गेल्या ३५ वर्षांपासून महाकालीच्या दर्शनासाठी येणारे परसराम बामणे म्हणाले की, महाकालीचे आपल्यावर लक्ष असल्याने वयाच्या ३५ व्या वर्षीपासून नियमीत यात्रेला येतो. त्यामुळे आपण मागीतलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. व महाकाली मातेला भेटण्याचा आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले. चंद्रपूरची यात्रा पूर्वी पंधरा दिवस ते पाऊण महिना चालायची. मात्र ही वैभवी यात्रा अलिकडे आठवड्यावर आली आहे. प्रवासाची साधने वाढल्याने भाविक खाजगी वाहनाने येतात. दर्शन झाल्यावर रात्रभर थांबून परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे अलिकडच्या काळात यात्रेचे दिवस कमी झाले असले तरी भक्तीचा पूर मात्र कायमच आहे. नांदेड जिल्ह्यातील चिकाळा तांडा येथून आलेले आनंदसिंग धनसिंग राठोड यांनी सांगितले की, मागील तीन वर्षापासून संपूर्ण परिवारासोबत गावच्या जवळपास ५० भाविकांसोबत मातेच्या दर्शनाला येतो. महाकाली मातेचे दर्शन केल्याने साक्षात देव भेटल्यासारखे वाटते. मनाला आनंद होतो. त्यामुळे याठिकाणी आठवडाभर संपूर्ण परिवारासोबत येथे वास्तव्यास राहत असतो.आनंदसिंग राठोड यांच्याप्रमाणे पहिल्याच वर्षी मातेच्या दर्शनासाठी आलेले परभणीचे अजय गुंडाळे यांनी जीवनार्च सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, यात्रेला येण्याचा पहिलाच वर्ष आहे. मात्र महाकाली यात्रेला आल्याने आनंद झाला. अनेक वर्षापासूनची दर्शन घेण्याची ईच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आता दरवर्षी महाकाली यात्रेला येण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या सुभाबाई सोपान सूर्यवंशी यांनी मातेच्या आशिर्वादाने सुखी संसार सुरू असल्याची माहिती दिली.परळी येथील सागरबाई बल्लाळ दोन दिवसांपासून महाकाली मंदिर परिसरात मुक्कामाला आहेत. महाकालीने त्यांची मनोकामना पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. मायेच्या वाटेला येताना १० वर्ष पूर्ण झाले आहेत. गावातील देवकरीण व परिसरातील भाविकांसोबत मायेच्या वाटेला येत असतो. त्यामुळे एकप्रकारचे समाधान लाभत असते. आजपर्यंत जे मागीतले त्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे नियमीत यात्रेला येत असते, असेही सागरबाई यांनी स्पष्ट केले. परळीचेच भरत जाधव म्हणाले की, मागील सात वर्षांपासून नियमित येत आहे. आठवडाभर मातेच्या चरणी राहत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होत असते. आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे दरवर्षी महाकाली यात्रेला येत असतो. (नगर प्रतिनिधी)दर्शनासाठी लागल्या रांगाचैत्र शुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधून झरपटच्या पात्रात पवित्र स्रान करण्याची देवी महाकालीच्या भक्तगणांची परंपरा आहे. या स्रानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग असते. कुटुंबातील बायकापोरांसह आणि वृद्धांसह आलेलेही अनेक जण यात सहभागी असतात. यंदा शुक्रवारी चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त आहे. अजूनही भाविकांचे जत्थे दाखल होणे सुरूच आहे. परिसरात घुमणारे पोतराजे आणि लयबद्धपणे वाजणाऱ्या डफड्यांमुळे हा परिसर सध्या २४ तास निनादतो आहे. यात्रेला नियमित येण्याचा संकल्पमध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून पहिल्यांदाच आलोक शर्मा महाकालीच्या दर्शनासाठी आले आहेत. त्यांचा महाकालीच्या यात्रेला येणाऱ्या हा पहिलाच अनुभव आहे. यात्रेला आल्याने दर्शन झाले. महाकालीच्या दर्शनानंतर त्यांच्या मनाला समाधान लाभले. त्यामुळे त्यांनी आता यात्रेला नियमित येण्याचा संकल्प केला आहे.