शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

महाकालीची ओढ लागली जीवाला...

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत.

५० वर्षांपासून वारी : भोपाळ, नांदेड, बीड, परभणी, तेलंगणाचे भक्त दर्शनाला आतूरचंद्रपूर : नवसाला पावणारी माय महाकालीची भक्तांच्या मनाला लागली आहे. महाकालीचे दर्शन घेण्याची केवळ एकमेव आशा बाळगून असलेले भक्त गेल्या ५०-६० वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. या भाविकांच्या गर्दीमुळे महाकाली मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. माता महाकालीची अंतर्मनात भक्ती असून डफड्याच्या तालावर आपल्याच नादात जाणारे भक्त लक्ष वेधून घेत आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करुनही चेहऱ्यावर जराही थकवा न दिसणारे मराठवाड्यातील भाविक या भक्तीमेळ्यात आनंदाचे बीज पेरून जातात. नांदेड येथून गेल्या ३५ वर्षांपासून महाकालीच्या दर्शनासाठी येणारे परसराम बामणे म्हणाले की, महाकालीचे आपल्यावर लक्ष असल्याने वयाच्या ३५ व्या वर्षीपासून नियमीत यात्रेला येतो. त्यामुळे आपण मागीतलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. व महाकाली मातेला भेटण्याचा आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले. चंद्रपूरची यात्रा पूर्वी पंधरा दिवस ते पाऊण महिना चालायची. मात्र ही वैभवी यात्रा अलिकडे आठवड्यावर आली आहे. प्रवासाची साधने वाढल्याने भाविक खाजगी वाहनाने येतात. दर्शन झाल्यावर रात्रभर थांबून परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे अलिकडच्या काळात यात्रेचे दिवस कमी झाले असले तरी भक्तीचा पूर मात्र कायमच आहे. नांदेड जिल्ह्यातील चिकाळा तांडा येथून आलेले आनंदसिंग धनसिंग राठोड यांनी सांगितले की, मागील तीन वर्षापासून संपूर्ण परिवारासोबत गावच्या जवळपास ५० भाविकांसोबत मातेच्या दर्शनाला येतो. महाकाली मातेचे दर्शन केल्याने साक्षात देव भेटल्यासारखे वाटते. मनाला आनंद होतो. त्यामुळे याठिकाणी आठवडाभर संपूर्ण परिवारासोबत येथे वास्तव्यास राहत असतो.आनंदसिंग राठोड यांच्याप्रमाणे पहिल्याच वर्षी मातेच्या दर्शनासाठी आलेले परभणीचे अजय गुंडाळे यांनी जीवनार्च सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, यात्रेला येण्याचा पहिलाच वर्ष आहे. मात्र महाकाली यात्रेला आल्याने आनंद झाला. अनेक वर्षापासूनची दर्शन घेण्याची ईच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आता दरवर्षी महाकाली यात्रेला येण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या सुभाबाई सोपान सूर्यवंशी यांनी मातेच्या आशिर्वादाने सुखी संसार सुरू असल्याची माहिती दिली.परळी येथील सागरबाई बल्लाळ दोन दिवसांपासून महाकाली मंदिर परिसरात मुक्कामाला आहेत. महाकालीने त्यांची मनोकामना पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. मायेच्या वाटेला येताना १० वर्ष पूर्ण झाले आहेत. गावातील देवकरीण व परिसरातील भाविकांसोबत मायेच्या वाटेला येत असतो. त्यामुळे एकप्रकारचे समाधान लाभत असते. आजपर्यंत जे मागीतले त्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे नियमीत यात्रेला येत असते, असेही सागरबाई यांनी स्पष्ट केले. परळीचेच भरत जाधव म्हणाले की, मागील सात वर्षांपासून नियमित येत आहे. आठवडाभर मातेच्या चरणी राहत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होत असते. आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे दरवर्षी महाकाली यात्रेला येत असतो. (नगर प्रतिनिधी)दर्शनासाठी लागल्या रांगाचैत्र शुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधून झरपटच्या पात्रात पवित्र स्रान करण्याची देवी महाकालीच्या भक्तगणांची परंपरा आहे. या स्रानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग असते. कुटुंबातील बायकापोरांसह आणि वृद्धांसह आलेलेही अनेक जण यात सहभागी असतात. यंदा शुक्रवारी चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त आहे. अजूनही भाविकांचे जत्थे दाखल होणे सुरूच आहे. परिसरात घुमणारे पोतराजे आणि लयबद्धपणे वाजणाऱ्या डफड्यांमुळे हा परिसर सध्या २४ तास निनादतो आहे. यात्रेला नियमित येण्याचा संकल्पमध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून पहिल्यांदाच आलोक शर्मा महाकालीच्या दर्शनासाठी आले आहेत. त्यांचा महाकालीच्या यात्रेला येणाऱ्या हा पहिलाच अनुभव आहे. यात्रेला आल्याने दर्शन झाले. महाकालीच्या दर्शनानंतर त्यांच्या मनाला समाधान लाभले. त्यामुळे त्यांनी आता यात्रेला नियमित येण्याचा संकल्प केला आहे.