शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ गाव नावाजले, मात्र वादंगाने गाजले; ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 13:25 IST

सरपंचाची पोलिसांत तक्रार, तिघांविरुद्ध गुन्हा

पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील महिलांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने गावाचे नाव गाजले. मात्र, याच महादवाडीत वादंग निर्माण होत असून, कोणत्या ना कोणत्या कारणाने गाव चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. येथील ग्रामपंचायतला ७ ऑक्टोबर रोजी ६ वाजेच्या सुमारास भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जगदीश मेश्राम यांनी कुलूप ठोकले. याविरोधात सरपंच भोजराज कामडी यांनी पोलिसात तक्रार दिल्याने मेश्राम यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महादवाडी ग्रामपंचायतचे शिपाई सिद्धार्थ रामटेके यांना शासकीय दस्तावेज व आर्थिक घोळ केल्याच्या कारणांमुळे कामावरून कमी केले होते. गोंगले नामक व्यक्तीच्या जागेचा वाद होता. याच मुद्द्यांवरून भीम आर्मी संघटनेचे जगदीश मेश्राम व इतर तीन जणांनी महादवाडीत येऊन सरपंचांना फोन केला. शिपाई सिद्धार्थ रामटेके व गोपीचंद गोंगले यांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेऊन चौकशीसाठी आलो, अशी माहिती दिली.

सरपंच भोजराज कामडी यांनी जगदीश मेश्राम यांना लेखी पत्र द्या तुम्हाला माहिती देतो. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असेही फोनवर सांगितले. त्यानंतर मेश्राम हे महादवाडी येथील सिद्धार्थ रामटेके व रवींद्र रामटेके यांच्या घरी आले व प्रेमिला लोगडे यांचे घरी जाऊन आम्ही अधिकारी आहोत, आम्हाला महिला मंडळाची सभा ग्रामपंचायतमध्ये आहे, अशी बतावणी करून महिलांना बोलविले. सभा न घेता संघटनेचे मेश्राम यांनी ग्रामपंचायतच्या मुख्य द्वाराला कुलूप ठाेकले, अशी तक्रार सरपंच कामडी यांनी दिली. तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी जगदीश मेश्राम व इतर तिघांविरुद्ध भादंवि ३५१, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलीस हवालदार मोहन धानोरे व पोलीस शिपाई दगडू सरवदे यांनी पंचनामा करून कुलूप तोडण्याची विनंती केली. मात्र सरपंच कामडी व गावकऱ्यांनी ज्यांनी कुलूप ठोकले त्यांनीच काढावे, अशी भूमिका घेतली. परिणामी ग्रामपंचायत अजूनही कुलूपबंद आहे.

प्रशासकीय अधिकारी किंवा आरोपी आल्यावरच कुलूप काढू, असा पवित्रा सरपंच व गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कुलूपबंद आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सर्व चौकशी करून अटकेची कारवाई करू.

- मोहन धनोरे, अंमलदार, पोलीस ठाणे, चिमूर

लोकांच्या तक्रारीनुसार एसडीओला निवेदन दिले होते. ग्रामपंचायतला भेट दिली. मात्र तिथे लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक हजर नव्हते. ग्रामसेवकांना फोनवरून माहिती दिली असता टाळाटाळ केली. त्यामुळे ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.

- जगदीश मेश्राम, अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दल, चिमूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर