शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात सर्वात कमी ५२ टक्के मतदान

By admin | Updated: February 18, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६९.४७ टक्के मतदान झाले आहे.

सरासरी ६९.४७ टक्के : जिल्हाभरात मतदार यादीत घोळचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६९.४७ टक्के मतदान झाले आहे. उशिरा रात्री पोलिंग पार्ट्या पोहोचल्यानंतर शुक्रवारी प्रशासनाने मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर केली. त्यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वात कमी ५२.४९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकांना मतदान न करताच परत जावे लागले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. ते सायंकाळ ५.३० वाजेपर्यंत सुरू होते. काही मतदार वेळेवर पोहोचल्याने त्यांचे मतदान करून घेण्यात आले. दुपारी १२.३० वाजतापर्यंत २३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा ओघ वाढला. मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या. परंतु चंद्रपूर तालुक्यात सायंकाळपर्यंतही टक्केवारीमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. तेथे १२.३० वाजेपर्यंत १४.११ टक्के, २.३० वाजेपर्यंत २३.७१ टक्के आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान झाले.मतदार यादीमध्ये घोळ असल्याने अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. प्रशासनाने नवीन मतदार नोंदणी केल्यानंतर जानेवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. त्या यादीच्या आधारेच मतदान घेण्यात आले. त्यानंतर मतदारापर्यंत चिठ्ठ्या पोहोचविण्यात न आल्याने मतदारांना आपला मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांक, याची माहिती मिळू शकली नाही. मतदानादरम्यान, बल्लारपूर तालुक्यात कवडजई येथील मतदान केंद्रावर सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर शेख यांच्यावर दोघांनी हल्ला चढविला. तर गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ मतदान खोळंबले होते. (प्रतिनिधी) चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघांचा परिसर बहुतांश नागरी वस्तीचा आहे. या भागातील उद्योगांमध्ये बाहेरगावचा मजूर वर्ग काम करतो. तो गावाकडे गेला की, मतदान करू शकत नाही. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यात कमी मतदान झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली आहे. मतदानात वाढ व्हावी, याकरिता प्रशासनातर्फे यापुढेही प्रयत्न केले जातील.- आशिष वानखेडे, तहसीलदार, चंद्रपूर.सर्वाधिक ब्रह्मपुरीत ७९.७२ टक्केअंतिम मतदान संख्येनुसार, जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक ७९.७२ टक्के मतदान झाले आहे. सिंदेवाही तालुक्यात ७६.८१ टक्के, मूल ७५.८६ टक्के, पोंभुर्णा ७५.१९ टक्के, सावली ७४.०६ टक्के, चिमूर ७२.८९ टक्के, नागभीड ७२.६२ टक्के, जिवती ७२.३१ टक्के, गोंडपिपरी ७१.६९ टक्के, राजुरा ७०.४७ टक्के, कोरपना ६९.५३ टक्के, वरोरा ६७.५६ टक्के, बल्लारपूर ६४.१७ टक्के, भद्रावती ६२.८६ टक्के आणि चंद्रपूर तालुक्यात ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.