शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

57 दिवसांपासून 237 एसटी जागेवर थांबल्याने दररोज 25 लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

एसटी महामंडळ बरखास्त करून सरकारमध्ये विलगीकरण करावे, ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मुंबई  उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने समिती नेमली आहे. मात्र, तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने खासगी प्रवासी बस,विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली. परंतु, खासगी वाहतूक करणारे काही जण मनमानी दर आकारत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून  ५७ दिवस होत आहेत. तेव्हापासून एसटी जागेवरच असल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे तर दुसरीकडे चार आगारांचे दररोज सुमारे २५ लाखांचे नुकसान होत आहे. हा संप मिटण्याची स्थिती दिसत नसल्याने नुकसानीचा आकडा पुन्हा वाढू शकतो. एसटी महामंडळ बरखास्त करून सरकारमध्ये विलगीकरण करावे, ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मुंबई  उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने समिती नेमली आहे. मात्र, तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने खासगी प्रवासी बस,विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली. परंतु, खासगी वाहतूक करणारे काही जण मनमानी दर आकारत आहेत.  

एवढे नुकसान कधीच झाले नाहीचंद्रपूर, राजुरा, चिमूर व वरोरा असे चार आगार आहेत. वरोरा आगार लहान आहे.  चारही आगारातून शहरी, ग्रामीण व दुर्गम भागात सुमारे २५० पेक्षा जास्त एसटी फेऱ्या व्हायच्या. महामंडळाला बऱ्यापैकी लाभ व्हायचा. पण, एवढे नुकसान कधीच झाले नाही.

दहा महिने कोरोना- कोरोना काळात सर्वच आगारांचे बसेस बंद होते. कोरोना संसर्गाचा ग्राफ कमी झाल्यानंतर काही निर्बंधांसह  जिल्ह्यात एसटी सुरू झाली.  कोरोनाने पुन्हा बंद पडली.- दहा महिन्यांपासून उत्पन्न बंद आहे.  कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी अडचणीत सापडली. संप सुरूच असल्याने एसटीचे उत्पन्न बंद झाले आहे. 

संपामुळे प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.  हा संप संपेल असे वाटत होते. पण, ५७ दिवसांनंतरही कर्मचारी  ठाम आहेत. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातून उमरेड येथून चिमूर येथे एसटी आली. मात्र, चंद्रपूर, वरोरा, चिमूर व राजुरा डेपोतून एकही बस सुरू झाली नाही. यामुळे आर्थिक फटका बसला आहे.

प्रवाशी म्हणतात, आम्हाला वेठीस धरू नका

मागण्यांसाठी लढा देण्याचा हक्क आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी आडमुठी भूमिका सोडावी, नागरिकांना वेठीस धरू नये. मागण्या मान्य करण्यासाठी संप मागे घेऊन वाटाघाटीवर विश्वास ठेवावा.- विवेक रासपल्ले, तुकूम, चंद्रपूर 

खासगीकरणाच्या नावाखाली संविधानात्मक सार्वजनिक संस्था विकत आहेत. यामध्ये केंद्र सरकार तर चार पाऊल पुढे आहे. अशावेळी एसटी महामंडळाला सरकारी करण्याची मागणी फारच आश्चर्यकारक आहे.- निशांत बोढाले, बेरोजगार युवक, चंद्रपूर 

चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारातील सर्व बसेस बंद आहेत. त्यामुळे आगाराला दररोज सुमारे २५ लाखांचा आर्थिक फटका बसत आहे.

- स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप