शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

शेतातील विहीर खचून लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2014 23:01 IST

येथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील

वेदांत मेहरकुळे - गोंडपिपरीयेथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील पिकाला धोका निर्माण झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.भूगर्भातील समतोल बिघडून सदर प्रकार घडल्याचा अंदाज परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. तालुक्यातील आक्सापूर येथील शेतकरी बाबुराव वारलु गव्हारे यांचे चंद्रपूर मार्गावर दोन हेक्टर १७ आर. शेत आहे. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास बाबुराव गव्हारे यांचा मुलगा चंद्रजित गव्हारे हा धान पिकाला पाणी करण्यासाठी गेला असता, विहीरीच्याकडेला ठेवलेली आईल इंजिन सुरु असतानाच विहीरीतील पाण्याने एकाएक उफाळा मारुन विहिरीच्या तोंडीवर अंदाजे पाच फूट उंचीवर दाब मारत पाणी लगेच खाली गेले. हा प्रकार बघण्यासाठी चंद्रजितने आईल इंजिन जवळ जाताच पाण्याच्या उफाळ्याचा दाब कमी होवून पाण्याने विहीरीची दगडी तोंडी व आईल इंजिन तसेच इतर साहित्य विहिरीत जमीनदोस्त झाले. तर केवळ दोन फूट अंतरावर असलेल्या चंद्रजितच्या पाया जवळीलही जमीन खचली. मात्र तो थोडक्यात बचावला. असा प्रकार तालुक्यात प्रथमच घडला असून शनिवारी आक्सापूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बाबुराव गव्हारे यांचे शेत गाठून बुडबुडे पाहण्यासाठी गर्दी केली. यावर्षी अल्पवृष्टीमुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना, बाबुराव गव्हारे यांनी ग्रामीण बँकेतून ९० हजार रुपयाचे कर्ज घेवून दोन हेक्टर १७ आर. क्षेत्रात भात पीक घेण्याचे ठरविले. मात्र विहिर खचल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून जवाहर योजनेअंतर्गत मंजूर विहिर बांधकामात त्यांनी मजबुतीसाठी मंजुर निधी पेक्षा अधिक गुंतवणूक केल्याचे सांगितले. विहीर खचल्याने शेतातील धान पिकांना पाण्याअभावी धोका निर्माण झाला असून २० हजार रुपयाची आईल इंजिनही जमीनदोस्त झाल्याने गव्हारे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. (तालुका प्रतिनिधी)