शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील विहीर खचून लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2014 23:01 IST

येथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील

वेदांत मेहरकुळे - गोंडपिपरीयेथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील पिकाला धोका निर्माण झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.भूगर्भातील समतोल बिघडून सदर प्रकार घडल्याचा अंदाज परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. तालुक्यातील आक्सापूर येथील शेतकरी बाबुराव वारलु गव्हारे यांचे चंद्रपूर मार्गावर दोन हेक्टर १७ आर. शेत आहे. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास बाबुराव गव्हारे यांचा मुलगा चंद्रजित गव्हारे हा धान पिकाला पाणी करण्यासाठी गेला असता, विहीरीच्याकडेला ठेवलेली आईल इंजिन सुरु असतानाच विहीरीतील पाण्याने एकाएक उफाळा मारुन विहिरीच्या तोंडीवर अंदाजे पाच फूट उंचीवर दाब मारत पाणी लगेच खाली गेले. हा प्रकार बघण्यासाठी चंद्रजितने आईल इंजिन जवळ जाताच पाण्याच्या उफाळ्याचा दाब कमी होवून पाण्याने विहीरीची दगडी तोंडी व आईल इंजिन तसेच इतर साहित्य विहिरीत जमीनदोस्त झाले. तर केवळ दोन फूट अंतरावर असलेल्या चंद्रजितच्या पाया जवळीलही जमीन खचली. मात्र तो थोडक्यात बचावला. असा प्रकार तालुक्यात प्रथमच घडला असून शनिवारी आक्सापूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बाबुराव गव्हारे यांचे शेत गाठून बुडबुडे पाहण्यासाठी गर्दी केली. यावर्षी अल्पवृष्टीमुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना, बाबुराव गव्हारे यांनी ग्रामीण बँकेतून ९० हजार रुपयाचे कर्ज घेवून दोन हेक्टर १७ आर. क्षेत्रात भात पीक घेण्याचे ठरविले. मात्र विहिर खचल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून जवाहर योजनेअंतर्गत मंजूर विहिर बांधकामात त्यांनी मजबुतीसाठी मंजुर निधी पेक्षा अधिक गुंतवणूक केल्याचे सांगितले. विहीर खचल्याने शेतातील धान पिकांना पाण्याअभावी धोका निर्माण झाला असून २० हजार रुपयाची आईल इंजिनही जमीनदोस्त झाल्याने गव्हारे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. (तालुका प्रतिनिधी)