शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 8, 2016 01:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली.

गोसेखुर्द प्रकल्प : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षउदय गडकरी सावलीगोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली. त्या शेतीचा मोबदला देताना मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आहे. शिवाय जास्त जमीन जाऊनही कमी मोबदला देण्यात आला आहे, असे असले तरी आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी किंवा शेतकऱ्यांनी या संदर्भात आवाज उठविला नाही.गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे अधीग्रहण केले. त्यात केवळ जेवढी जमीन गेली, तेवढ्याच जमिनीचा मोबदला त्या-त्या दरानुसार देण्यात आला. परंतु शेतामध्ये असलेल्या विहिरी, कुपनलिका, घरे, मोठमोठी झाडे, किंवा कुंपन या आणि तत्सम बाबींचा कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी त्या लाभापासून वंचीत राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पाच्या कामासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या, त्या शेतीचे सिमांकन भूमी अभिलेख विभागाच्या मार्फतीने करण्यात येते. त्यात गोसेखुर्द प्रकल्प विभागाचे अधिकारीही उपस्थित राहतात. परंतु सिमांकनाच्या वेळी प्रत्यक्ष जमिनीचीच आराजी गृहीत धरली जात आहे. मात्र शेतात असलेले घर, विहीर, झाडे, कुपनलिका, मोटारपंप, किंवा शेताला करण्यात आलेले कुंपन यांची नोंदच जाणीवपूर्वक घेतली जात नाही. शिवाय काही शेतकऱ्यांची अधिग्रहीत झालेली शेती प्रत्यक्षात जास्त असूनसुद्धा कागदोपत्री कमी दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष अधिग्रहीत झालेल्या आराजीची दुरुस्ती करून देण्याच्या मागणीसाठी कार्यालयात चकरा मारतात. सतत पाठपुरावा करूनसुद्धा निगरगट्ट प्रशासन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मोबदल्यापासून वंचित राहावे लागत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत झालेल्या शेतीचा मोबदला योग्य रितीने न देता या विभागाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.