शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण कक्षाची बियाणे बाजारावर नजर

By admin | Updated: May 15, 2014 23:25 IST

दरवर्षी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून अनेकजण शेतकर्‍यांची लुट करतात. मात्र यावर्षी कृषी विभागाची बियाण्यांच्या काळ्या बाजारावर करडीनजर राहणार आहे.

चंद्रपूर : दरवर्षी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून अनेकजण शेतकर्‍यांची लुट करतात. मात्र यावर्षी कृषी विभागाची बियाण्यांच्या काळ्या बाजारावर करडीनजर राहणार आहे. जिल्हास्थळावर एक आणि तालुकास्तरावर १५ अशा एकूण सोळा सोयाबीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांच्या नियंत्रणात एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. तालुकास्तरावरील अधिकार्‍यांना अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली लागणार आहे. या नियंत्रण कक्षातून सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता, त्यांचे समान वितरण याची माहिती असणार आहे. मागील वर्षातील चांगल्या प्रतीच्या उपलब्ध सोयाबीनबाबत माहिती संकलित करण्यासह शेतकर्‍यांशी संपर्कात राहून अर्धवेळ गुणनियंत्रकांना नमुने काढावे लागणार आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता कशी होईल, यादृष्टीने तालुका कृषी अधिकारी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास कक्षाला कळविण्याचे आवाहनही विभागाने केले आहे. मागील काही वर्षात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे बियाण्यांची मागणीही वाढली आहे. खरिपाच्या तोंडावर कंपन्यांकडून बियाणे येत असले तरी, काही कृषी केंद्र संचालकांकडून कृत्रिम टंचाई भासववली जाते. यामुळे शेतकर्‍यांना जादा रक्कम देऊन बियाणे खरेदी करावी लागतात. मात्र यावर्षी सोयाबीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यावर आळा बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख १0 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी ४ लख ४0 हजार बिटी कापसाच्या पिशव्यांची मागणी करण्यात आली. पैकी ४ लाख ७१ हजार पिशव्यांचे आवंटन मागणी करण्यात आली. पैकी ४ लाख ७१ हजार पिशव्यांचे आवंटन जिल्ह्यासाठी आयुक्तालयाकडून प्राप्त झाले. खरीप हंगामासाठी ७३ हजार ८00 मेट्रीक टन खताचे आवंटन झाले. सध्या ८ हजार १0६ मेट्रीक टन युरिया टन खताचे आवंटन झाले. इतर खतांचा १८ हजार ४0१ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध असून हा मुबलक असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मूल येथे रॅक पॉइंट मंजूर असल्याने त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांना लाभ होईल. असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)