शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
4
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
5
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
6
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
7
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
8
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
9
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
11
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
12
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
13
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
14
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
15
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
16
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
17
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
18
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
19
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
20
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांच्या लागल्या रांगा; केंद्राची चमू आलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

या वर्षी मात्र कोणत्याही केंद्रावर कुठल्याही शेतकऱ्याला धान नेता येईल, असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तालुक्यात एकूण १० केंद्रे आहेत. कोठारांच्या क्षमतेत तफावत आहे. कोठारांत पोते ठेवताना दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवावे. असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. आठवडाभरात एक चमू पाहणी करण्याकरिता व मोजणी करण्याकरिता येणार होती. दीड महिन्याचा कालावधी लोटूनही केंद्र शासनाची चमू आली नाही.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी :  कोणत्याही शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आपला माल विकण्याचे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तसेच धानाचे पोते ठेवताना त्यात अंतर ठेवावे. धानाची मोजणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू आठ दिवसांत येणार होती. अद्यापही मोजणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू आली नाही. त्यामुळे साठवणूक केंद्र फुल्ल झाले आहेत. अनेक केंद्रांबाहेर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या असल्याने शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागते.दरवर्षी शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. या वर्षी मात्र कोणत्याही केंद्रावर कुठल्याही शेतकऱ्याला धान नेता येईल, असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तालुक्यात एकूण १० केंद्रे आहेत. कोठारांच्या क्षमतेत तफावत आहे. कोठारांत पोते ठेवताना दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवावे. असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. आठवडाभरात एक चमू पाहणी करण्याकरिता व मोजणी करण्याकरिता येणार होती. दीड महिन्याचा कालावधी लोटूनही केंद्र शासनाची चमू आली नाही. पोत्यांमध्ये अंतर ठेवल्याने उंचावर पोते चढविता येत नाही. त्यामुळे कोठारात जागा फुल्ल झाली आहे. पोते ठेवावे कुठे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. धानखरेदीकरिता शेतकरी अनेक केंद्रांवर ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक केंद्रांवर चकरा माराव्या लागत आहेत. केंद्रांच्या बाहेर धान भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. आधीच हवामानामुळे अत्यंत कमी पीक झाले. दोन पैसे जास्त मिळतात म्हणून आधारभूत केंद्रांवर धान विकण्यासाठी शेतकरी आले आहेत. मात्र, ताटकळत राहावे लागत असल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. 

त्या केंद्रावर मोजावे   लागते भाडेयेथील कुर्झा वाॅर्डातील शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर कोठाराचा किराया म्हणून क्विंटलमागे २५ रुपये शेतक-यांकडून घेण्यात येत आहे. तर, काट्यापर्यंत धान नेणे, दुसऱ्या पोत्यात पलटविणे, याकरिता मजुरी घेण्यात येते.

दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवल्याने उंचावर पोते चढविता येत नाही. त्यामुळे कोठारात जागा अधिक गुंतते. केंद्र शासनाची चमू आठवडाभरात पाहणी करण्यासाठी येणार होती. मात्र, अद्यापही चमू आली नाही. - प्रभाकर सेलोकर,मुक्त प्रशासक, कृ.उ.बा. समिती़,ब्रह्मपुरी

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी