शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लॉलीपॉप

By admin | Updated: May 29, 2015 01:44 IST

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे.

नांदाफाटा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे. यासाठी कर्जाच्या आधारावर राष्ट्रीयकृत बँकामधून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेतून चार ते सहा हजार रुपये दरवर्षी विम्याच्या नावावर कपात करण्यात येत आहे. मात्र याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी, रोग, अळी, पूर आदींचा सामना करावा लागतो. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कृषी विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने बँक खात्यातून कपात करण्यात येत असलेल्या या पैशांचे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी राष्ट्रीयकृत बँकामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी सातबाऱ्यावर अतिरिक्त बोजा चढविण्यात येत आहे. ज्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना बोझा चढवायची गरज नसल्याचे दिसते. याउलट शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशातून विम्यासाठीचे पैसे कपात केल्यामुळे पाहिजे तेवढ्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन धान, तूर यासारखी पिके नष्ट झाल्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. शासनाने अतिवृष्टी, दुष्काळ, पुरबुडी आदींचे पॅकेज शेतकऱ्यांना याआधी वाटप केले आहे. यात सरसकट वाटप करताना काही शेतकऱ्यांचे लाभार्थी यादीत नावे आली नाही. त्यामुळे अनेकांना या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. दरवर्षी चार ते सहा हजार रुपये कपात होत असल्याने आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत बँकांमध्ये विचारणा केली असता काहीच न सांगता पैसे कपात करण्याचा शासनाचाच आदेश असल्याचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)