शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लॉलीपॉप

By admin | Updated: May 29, 2015 01:44 IST

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे.

नांदाफाटा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे. यासाठी कर्जाच्या आधारावर राष्ट्रीयकृत बँकामधून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेतून चार ते सहा हजार रुपये दरवर्षी विम्याच्या नावावर कपात करण्यात येत आहे. मात्र याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी, रोग, अळी, पूर आदींचा सामना करावा लागतो. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कृषी विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने बँक खात्यातून कपात करण्यात येत असलेल्या या पैशांचे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी राष्ट्रीयकृत बँकामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी सातबाऱ्यावर अतिरिक्त बोजा चढविण्यात येत आहे. ज्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना बोझा चढवायची गरज नसल्याचे दिसते. याउलट शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशातून विम्यासाठीचे पैसे कपात केल्यामुळे पाहिजे तेवढ्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन धान, तूर यासारखी पिके नष्ट झाल्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. शासनाने अतिवृष्टी, दुष्काळ, पुरबुडी आदींचे पॅकेज शेतकऱ्यांना याआधी वाटप केले आहे. यात सरसकट वाटप करताना काही शेतकऱ्यांचे लाभार्थी यादीत नावे आली नाही. त्यामुळे अनेकांना या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. दरवर्षी चार ते सहा हजार रुपये कपात होत असल्याने आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत बँकांमध्ये विचारणा केली असता काहीच न सांगता पैसे कपात करण्याचा शासनाचाच आदेश असल्याचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)