शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लॉलीपॉप

By admin | Updated: May 29, 2015 01:44 IST

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे.

नांदाफाटा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे. यासाठी कर्जाच्या आधारावर राष्ट्रीयकृत बँकामधून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेतून चार ते सहा हजार रुपये दरवर्षी विम्याच्या नावावर कपात करण्यात येत आहे. मात्र याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी, रोग, अळी, पूर आदींचा सामना करावा लागतो. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कृषी विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने बँक खात्यातून कपात करण्यात येत असलेल्या या पैशांचे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी राष्ट्रीयकृत बँकामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी सातबाऱ्यावर अतिरिक्त बोजा चढविण्यात येत आहे. ज्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना बोझा चढवायची गरज नसल्याचे दिसते. याउलट शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशातून विम्यासाठीचे पैसे कपात केल्यामुळे पाहिजे तेवढ्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन धान, तूर यासारखी पिके नष्ट झाल्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. शासनाने अतिवृष्टी, दुष्काळ, पुरबुडी आदींचे पॅकेज शेतकऱ्यांना याआधी वाटप केले आहे. यात सरसकट वाटप करताना काही शेतकऱ्यांचे लाभार्थी यादीत नावे आली नाही. त्यामुळे अनेकांना या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. दरवर्षी चार ते सहा हजार रुपये कपात होत असल्याने आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत बँकांमध्ये विचारणा केली असता काहीच न सांगता पैसे कपात करण्याचा शासनाचाच आदेश असल्याचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)