शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Lok Sabha Election 2019; आज थंडावणार प्रचार तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:20 IST

लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाचे विविध पथके परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची करडी नजर : आता छुप्या प्रचाराला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाचे विविध पथके परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहे.मतदान संपण्यापूर्वी ७२ तास आधी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, पोलीस स्टेशन व क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत रोख रक्कम, अवैध दारू, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र व मतदारांना प्रलोभन म्हणून वाटप करण्यात येणाऱ्या वस्तू यावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे. त्यामुळे सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केली आहे.कोणत्याही शासकीय कार्यालयाने मतदानापूर्वी शेवटच्या ७२ तासात बचतगटांना, अशासकीय संस्थांना, शासकीय कामावरील मजुरांची मजुरी व इतर तत्सम लाभ याबाबत कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नये. तसेच ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजेनंतर शासकीय यंत्रणेकडील ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) यंत्राव्यतिरिक्त कोणतेही ध्वनिक्षेपक यंत्र सुरु राहणार नाही, असे ध्वनिक्षेपक यंत्र आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांमार्फत गस्त सुरु राहणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी निर्भीडपणे आपले मतदानाचे कर्तव्य बजावावे व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची प्रक्रिया शांततेने पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.रोख रक्कम बाळगू नयेआवश्यकता नसेल तर ५० हजार रुपयांच्या वर रोख रक्कम जवळ बाळगू नये, बाळगायचीच असल्यास आवश्यक ते पुराव्याचे कागदपत्र सोबत ठेवावे व तपासणीच्या वेळी ते सादर करावे. तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. मतदानासाठी लाच देणे, धमकावणे, भीती दाखविणे अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगणे व सामाजिक शांततेचा भंग करणे हा केवळ निवडणूक विषयक गुन्हा नसून त्याबाबत भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कृत्ये कोणी करू नये. अशी कृत्ये करताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.बाहेरच्या व्यक्तींना मतदारसंघांमध्ये राहण्यास प्रतिबंधप्रचाराची मुदत ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर ज्यांची मतदार यादीमध्ये नावे नाहीत किंवा अन्य जिल्ह्यातील राजकीय किंवा कोणीही अन्य व्यक्तीने ११ एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये थांबू नये, अशा सक्त सूचना निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान किंवा मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या काळामध्ये मतदारसंघात राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील रहिवासी व मतदार यादीमध्ये नाव नसणाºया कुणीही व्यक्तीने निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करू नये, यासाठीही उपाययोजना आखण्यात येते. निवडणूक आयोगाच्या निर्दशानुसार अशा कोणत्याही व्यक्तीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त असून त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूर