शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

लॉकडाऊनने मोबाइल दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाने १३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी ...

कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाने १३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून तर ज्येष्ठाचा मोबाइल हाच एकमेव आधार ठरत आहे. वर्क फॉर्म होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट बॅंकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर आपसूकच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड दिसून येत आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ यावेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद अवस्थेत आहेत. आता शासनाने निर्बंध शिथिल केल्याने मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी अनेकांची धावपळ राहणार आहे.

बॉक्स

मोबाइलमध्ये बिघाड झाल्याची कारणे

मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले, सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड, आवाज न येणे किंवा जाणे, बॅटरी लवकर उतरणे, मोबाईल पडल्याने डिसप्ले फुटल्याच्या तक्रारी, पावसाळ्यापूर्वी मोबाइलला कव्हर लावणे, ॲटोमॅटिक इतरांना फोन लागणे, टच काम न करणे.

बॉक्स

दीड महिन्यांपासून बाजारपेठ बंद

कोरोनामुळे लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दीड महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडून आहेत.

बॉक्स

मोबाइल महत्त्वाचा पण आरोग्य

२१व्या शतकात मोबाइल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे. परंतु, सततच्या वापराने अनेकांच्या मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. सोमवारपासून सर्वच दुकाने सकाळी ७ ते २ या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी गर्दी करू नये, अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. मोबाइल जरी महत्त्वाचा असला तरी आपले आयुष्य त्यापेक्षा किमती आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीत्रूरु नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

-------

मागील वर्षभरापासूनच कोरोनाचे सकंट आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्राहक मोबाइल दुरुस्तीसाठी फोन करतात. परंतु, सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती बंद आहे. आता सोमवारपासून दुकाने चालू होत असल्याचे ऐकून थोडा दिलासा मिळाला आहे.

-पंकज बाविस्कर, मोबाइल दुकानदार