शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात समस्या निर्माण झाली आहे. दूध संकलनाची व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकाºयांना सूचना देवून दूध संकलन पूर्ण करण्याची मागणीही माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राव्दारे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने ईएमआय भरण्यासाठी तिन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ज्यांनी वाहन, घर व इतर बाबींसाठी कर्ज घेतले त्यांना याचा लाभ होईल. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक हप्ता भरण्यासाठी ३० जुनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात समस्या निर्माण झाली आहे. दूध संकलनाची व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकाºयांना सूचना देवून दूध संकलन पूर्ण करण्याची मागणीही माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.निराधाराचे अनुदान व जनधन खात्यात जमा होणाºया अनुदानाची रक्कम काढताना संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांच्या रांगा न लावता. सानिटायझरचा वापर करून सहजपणे पैसे काढता यावे. यासाठी नियोजन करावे. ३१ मार्चपर्यंत परवान्यांचे नुतनीकरण केल्या जाते. संचारबंदीमुळे सर्व कार्यालय बंद आहे. ३१ मार्चपर्यंत नुतनीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे ही मुदत ३० जुनपर्यंत वाढवावी. वाहनांचा विमा भरण्याची मुदत १४ एप्रिलपर्यंत संपत आहे. त्यामुळे विमा भरण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत करण्याचे पत्रात म्हटले आहे.वनालगतच्या गावांमधील गवताची कापणी करून चारा उपलब्ध कराकोरोना व्हायरसमुळे राज्यातील संपूर्ण कामकाज बंद पडले. ग्रामीण व आदिवासी भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. शेतकºयांच्या हितासाठी राज्य शासनाने तातडीने धोरण तयार करावे. वनालगतच्या गावामध्ये जंगलातील गवताची कापणी करून पाळीव जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जनावरांना पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून जनावरांना चारा उपलब्ध होईल व ही श्रुखंला तुटणार नाही. या दृष्टीने संबंधितांना तात्काळ निर्देश द्यावेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेशी निगडीत महत्त्वपूर्ण प्रश्नही प्राधान्यांने निकाली काढावे, असेही मुख्यसचिवांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार