शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 09:36 IST

सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आदेश प्रदूषण रोखण्यात व्यवस्थापन अपयशी

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण सोडणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला मिळालेल्या बंदच्या आदेशाने प्रदूषण ओकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कंपन्यांना मोठी चपराक बसली आहे.चंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे हा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते. या चौकशी अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर नीरीच्या माध्यमातूनही मोका चौकशी करण्यात आली. हा अहवालही आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यामध्येही कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्ते महेश मेंढे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. यासोबतच विविध पातळीवर सदर कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीचा आधार घेऊन अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपनीला बंद करण्याचे आदेश काढावे लागले.तरच कंपनी सुरू करता येणारबंददरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपायोजना केल्यानंतर कंपनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून कंपनी सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे.‘लोकमत’ने टिपली प्रत्येक घडामोडकंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार झाल्यानंतर शासन व प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहचविली हे विशेष.लॉयड्स कंपनीच्या राक्षसी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतातील कापूस काळा पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र त्यांनी गांभिर्याने न घेतल्याने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार अतिशय गांभिर्याने घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने अखेर कंपनीला ४८ तासात बंद करण्याचे आदेश बजावले आहे. प्रदूषणावरुन एखाद्या कंपनीला बंद करण्याची पाळी येत असेल, तर अन्य कंपन्यांनीही यापासून धडा घेण्याची गरज आहे.- महेश मेंढे, तक्रारकर्ते व सचिव चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणGovernmentसरकार