शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पिण्याच्या पाण्यात वाढताहेत जीवेघेणे घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:45 IST

भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असतानाच दुसरीकडे नैसर्गिक भूजलस्त्रोत प्रदूषित होत आहेत.

ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचा अहवाल : जिल्ह्यातून ७ हजार ९९३ नमुन्यांची तपासणी, ९४८ नमुने दूषित

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असतानाच दुसरीकडे नैसर्गिक भूजलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यात जीवघेण्या हानीकारक घटकांची सातत्याने वाढ होत असल्याचे जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांतून ७ हजार ९९३ नमुन्यांची तपासणी झाली. यामध्ये ९४८ नमुने दुषित आढळले. या दुषित पाण्यामुळे किडणी, हृदयरोग, फुप्फुस आणि अन्य विविध असाध्य आजारांचे प्रमाण वाढून अकाली मृत्यू ओढवू शकतो. मात्र, स्वत:हून पाणी तपासणीसाठी येणाºयांची संख्या अतिशय चिंताजनक असल्याचे अहवालातून दिसून आले.दैनंदिन जीवनात पिण्याकरिता वापरण्यात येणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याची तपासणी करण्याच्या हेतूने राज्य शासनाने चंद्रपुरात जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेची उभारणी केली. मुख्य अणुजीव शास्त्रज्ञांच्या नेतृत्वातील या प्रयोगशाळेत आरोग्य विभागासह शासनाचे विविध विभाग, वेकोलि, नगरपरिषद, ग्रामपंचायत आणि खासगी कंपनी अथवा व्यक्तींनी आणलेले पाण्याचे नमुने तपासून घेण्याची आधुनिक सुविधा आहे. रासायनिक व जैविक अशा दोन प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. खासगी कंपनी व व्यक्तींकडून नाममात्र शुल्क आकारल्या जाते. २०११ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत तपासलेल्या पाणी नमुन्यांवर दृष्टिक्षेप टाकल्यास जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत वर्षागणिक दूषित होत असल्याचे अहवालातून दिसून आले आहे. मार्च २०१२ ला शहरी विभागातून तपासलेल्या ५ हजार ६४३ नमुन्यांमध्ये २९८ नमुने दुषित ( ५. २७) टक्के आढळले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये तपासलेल्या ३ हजार ३८५ नमुन्यांमधून २३८ नमुने (७. ०९ टक्के) मानवी आरोग्यासाठी घातक सिद्ध झाले होते. ग्रामीण भागात २०११- २०१२ या वर्षात २१ हजार ७०८ नमुन्यांपैकी २ हजार ६८० नमुने (५. २७ टक्के) घातक निघाले. सप्टेंबर २०१७ पर्यंत ४ हजार ०६ पैकी ७१० नमुने (१५.४०) टक्के दुषित आढळले. तपासणीदरम्यान दुषित निघालेल्या पाण्यात मानवाला घातक ठरू पाहणारे घटक वर्षांगणिक वाढतच आहेत. त्यामुळे पाणी तपासणी करणे आणि दुषित घटकांपासून जलस्त्रोत सुरक्षित ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याकडेही हा अहवाल लक्ष वेधून घेतो. जलजागृती तसेच पाणी तपासणीसाठी स्थानिक स्वराज संस्था तसेच सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला नाही, तर येत्या काही वर्षांत जलजन्य आजारांपासून बळी जाणाºयांचे प्रमाण पुन्हा वाढू शकते.हॉटेल मालकांकडून पाणी तपासणीला ठेंगाचंद्रपूर शहर आणि तालुकास्तरावरील बहुतेक हॉटेलचालक तसेच पाण्याचा व्यवसाय करणाºया व्यापाºयांकडून पाण्याची तपासणीच केली जात नाही. जिल्हा प्रयोगशाळेत नाममात्र शुल्क स्वीकारून पाणी तपासणीची सुविधा असताना हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन निर्देश दिल्याने आरोग्य केंद्र, महानगर पालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींचे शेकडो नमुने दररोज तपासणीसाठी आणल्या जात आहेत. मात्र, पाण्याचा गोरखधंदा करणाºया व्यापाºयांनीच या तपासणीला ठेंगा दाखविला आहे.११ निकषांवर होते जैविक तपासणीपाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी ११ निकष आहेत. रासायनिक तपासणीसोबतच जैविक तपासणी गरजेची असून त्याद्वारे पाण्यातील जीवघेण्या घटकांचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार आरोग्यपूरक घटकांना सामावून घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत अथवा संस्थांना शिफारशी केल्या जातात. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ पर्यंत जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत ७१ नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील २० नमुने हानीकारक आढळले.बहुतेक आजार पाण्यापासूनच होतात. तपासणीतील ९४८ नमुन्यांत जीवघेणे घटक आहेत. त्यामुळे पाणी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. रासायनिक व जैविक या दोन्ही तपासण्या करून कुटुंब, शहर व गावाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे महत्त्व मोठे आहे. या प्रयोगशाळेतून पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी केली पाहिजे.- सी. जी. परुळकर, मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ