शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

मच्छीगुड्याच्या नशिबी उपेक्षिताचं जीणं

By admin | Updated: September 9, 2015 00:54 IST

आदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित

शंकर चव्हाण जिवतीआदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित असल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र जिवती तालुक्यातील मच्छीगुड्यातील नागरिकांना विकास म्हणजे काय, हे अजूनही या वस्तीला माहित नाही. विकासाची कुठलीच योजना आजवर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. गावात जायला धड रस्ता नाही. प्यायला योग्य पाणी नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या समाजाला घरकुल दिले नसल्याने आजही येथील नागरिक पडक्या घरात जीवन जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधी या गावात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता, गावकऱ्यांनी ‘लोकमत’पुढे आपल्या व्यथा मांडल्या.जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या मच्छीगुडा गावात १२ घरांची वस्ती आहे. जेमतेम ६० लोकसंख्या असलेल्या या गावाचे नाव तालुक्याच्या नकाशावर असले तरी अंगणवाडीशिवाय कुठलीच शासकीय योजना गावात पोहोचली नाही. गेल्या चार वर्षांपूर्वी या वस्तीत विजेचे खांब उभे करण्यात आलेत, मात्र अद्यापही विजेचा दिवे लावण्यात न आल्याने गावकऱ्यांना रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागत आहे. जीवती पंचायत समितीच्यावतीने येथील लोकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पिण्यास मिळावे याकरिता हातपंप लावण्यात आले. मात्र तेही अल्प कालावधीतच बंद पडले. त्यामुळे त्या नागरिकांना नाल्यावरच्या झऱ्यातील दूषित पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. राहायला योग्य घर नाही, जायला धड रस्ता नाही, हे खरे गावकऱ्यांचे दुखणे आहे. या मूलभूत प्रश्नांसाठी गावकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे. पण गेली पन्नास वर्षे वेदनेचे हुंकार देत जगणाऱ्यांचा आक्रोश आजवर राज्यकर्त्यांच्या कानी कधी पोहचलाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये शासन प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आम्ही कुठवर असं उपेक्षिताचं जीवन जगायचं, असा प्रश्न मच्छिगुडा वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला. खांब आहेत; पण वीज पुरवठा नाहीमच्छीगुड्यातील अंधार दूर व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने गेल्या चार वर्षापूर्वी विद्युत खांब उभे केले. काही दिवस विजेचा प्रकाशही गावात दिला. मात्र त्यानंतर मात्र वीज पुरवठा बंद झाला, तो अद्यापही सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. अनेक वेळा गावकऱ्यांनी ग्रामसेवकापुढे समस्या मांडण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही लक्ष दिले नसल्याने आजही नागरिकांना अंधाराचे जीवन जगावे लागत आहे. तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.