शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

मच्छीगुड्याच्या नशिबी उपेक्षिताचं जीणं

By admin | Updated: September 9, 2015 00:54 IST

आदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित

शंकर चव्हाण जिवतीआदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित असल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र जिवती तालुक्यातील मच्छीगुड्यातील नागरिकांना विकास म्हणजे काय, हे अजूनही या वस्तीला माहित नाही. विकासाची कुठलीच योजना आजवर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. गावात जायला धड रस्ता नाही. प्यायला योग्य पाणी नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या समाजाला घरकुल दिले नसल्याने आजही येथील नागरिक पडक्या घरात जीवन जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधी या गावात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता, गावकऱ्यांनी ‘लोकमत’पुढे आपल्या व्यथा मांडल्या.जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या मच्छीगुडा गावात १२ घरांची वस्ती आहे. जेमतेम ६० लोकसंख्या असलेल्या या गावाचे नाव तालुक्याच्या नकाशावर असले तरी अंगणवाडीशिवाय कुठलीच शासकीय योजना गावात पोहोचली नाही. गेल्या चार वर्षांपूर्वी या वस्तीत विजेचे खांब उभे करण्यात आलेत, मात्र अद्यापही विजेचा दिवे लावण्यात न आल्याने गावकऱ्यांना रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागत आहे. जीवती पंचायत समितीच्यावतीने येथील लोकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पिण्यास मिळावे याकरिता हातपंप लावण्यात आले. मात्र तेही अल्प कालावधीतच बंद पडले. त्यामुळे त्या नागरिकांना नाल्यावरच्या झऱ्यातील दूषित पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. राहायला योग्य घर नाही, जायला धड रस्ता नाही, हे खरे गावकऱ्यांचे दुखणे आहे. या मूलभूत प्रश्नांसाठी गावकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे. पण गेली पन्नास वर्षे वेदनेचे हुंकार देत जगणाऱ्यांचा आक्रोश आजवर राज्यकर्त्यांच्या कानी कधी पोहचलाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये शासन प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आम्ही कुठवर असं उपेक्षिताचं जीवन जगायचं, असा प्रश्न मच्छिगुडा वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला. खांब आहेत; पण वीज पुरवठा नाहीमच्छीगुड्यातील अंधार दूर व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने गेल्या चार वर्षापूर्वी विद्युत खांब उभे केले. काही दिवस विजेचा प्रकाशही गावात दिला. मात्र त्यानंतर मात्र वीज पुरवठा बंद झाला, तो अद्यापही सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. अनेक वेळा गावकऱ्यांनी ग्रामसेवकापुढे समस्या मांडण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही लक्ष दिले नसल्याने आजही नागरिकांना अंधाराचे जीवन जगावे लागत आहे. तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.