शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्ह्यात कमळ फुलले रॉका, शिवसेनेसह इतर पक्षांचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 01:15 IST

उमेदवार व मतदारांना गेल्या आठ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरूवारी संपली. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ जागा भाजपाने जिंकून

चंद्रपूर : उमेदवार व मतदारांना गेल्या आठ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरूवारी संपली. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ जागा भाजपाने जिंकून निर्विवाद स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ २० जागा जिंकता आल्या तर ३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचा पुरता सफाया झाला आहे. दोन्ही पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषदेतील नेतृत्व आता बाद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समित्यांमध्येही सफाया झाला असून जिल्हाभरातून केवळ दुर्गापूर १ या पंचायत समिती क्षेत्रातून पंकज ढेंगारे हे एकटेच निवडून आले. तर १५ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांवर भाजपाला स्पष्ट बहुमत असून काँग्रेसला ४ पंचायत समित्यांवर बहुमत मिळाले आहे. सावली व जिवती या पंचायत समितीवर कॉंग्रेस व भाजपाचे सारखे सदस्य निवडून आले असून सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाचे उमेदवार दावा करतात, याकडे लक्ष राहणार आहे. यावेळेस सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढविल्याने सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा झाल्या. तर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हान, विधानसभेचे उपगटनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी प्रचार सभा घेत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारून मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटी घेतल्या होत्या. मात्र निकालअंती चित्र स्पष्ट झाले आहे. गतवेळच्या तुलनेत यावर्षी भाजपाने जोरदार मुसंडी मारत ३३ जागा जिंकल्या. गतवेळी भाजपाला १८ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी भाजपाच्या १५ जागा वाढल्या आहेत. तर काँग्रेसने गतवेळच्या तुलनेत एक जागा गमाविली असून यावर्षी केवळ २० जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने गतवेळी ७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळेस खातेही उघडता आले नाही. तर शिवसेना, शेतकरी संघटना, बसपा, मनसेलाही गतवेळच्या तुुलनेत यावर्षी खातेही उघडता आले नाही. त्यामुळे या पक्षांचे जिल्हा परिषदेतील नेतृत्व पुर्णत: बाद झाले आहे. गुरूवारी सकाळी १० वाजतापासून प्रत्येक तालुका मुख्यालयी मतमोजणीला सुरूवात झाली. अर्धा-एक तासानंतर निकाल हाती यायला लागले आणि मतमोजणी केंद्र परिसर जल्लोषाने गजबजू लागले. मतमोजणी प्रक्रिया काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी सुरळीत पार पडली. (स्थानिक प्रतिनिधी)