शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

नागरिकांनीच केली लिकेज दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:51 IST

शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले. त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा कंंत्राटदाराचे दुर्लक्ष : गळतीमुळे गढूळ पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले. त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.रविवारी सकाळी ७ वाजता वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना दत्तनगर परिसरातील नागरिकांनी फोन करून मागिल अनेक महिन्यांपासून दत्तनगरमध्ये पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली. पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी सांगितले. तेव्हा नगरसेवक पप्पु देशमुख व नागरिकांनी नागपूर मार्गावरील अंजीकर शोरूम जवळील पुलाखाली असलेला लिकेज शोधून काढला. याबाबत नागरिकांनी उज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला फोन करून माहिती दिली. मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. रविवार दिवस असल्यामुळे तांत्रिक कामगार सुद्धा त्वरित येणार नाहीत, याची कल्पना नागरिकांना आली.त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख व प्रभागातील नागरिक दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे, केशव दारवणकर, महेंद्र राळे, गुलाबराव पुनवटकर, विश्वनाथ नक्षिणे, खेमराज चिवडे त्यांनी स्वत:च लिकेज दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे यांनी आपल्याकडील पाईप दुरूस्तीचे साहित्य आणले. सर्वजण नाल्यात उतरले आणि ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज होती, त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले.अशाप्रकारे नागरिकांनी व नगरसेवकाने स्वत: पुढाकार घेऊन लिकेज बंद केला. लिकेजमुळे विनाकारण पाणी वाया जात असल्याची माहिती दिल्यानंतरही उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते महेंद्र राळे यांनी केला आहे. शहर अजून पाणीटंचाईच्या धोक्यातून सावरलेला नसताना अशा समस्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.मनपा व पाणी पुरवठा कंपनीच्या कारभारावर प्रभागातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात असून पालिकेने वेळीच याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मनपाचे होतेय जाणिवपूर्वक दुर्लक्षशहरात अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दत्तनगर व वडगाव प्रभागातील अनेक ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होतो. नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या लेखी तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार देण्यात आल्या. आमसभेमध्येही हा प्रश्न वेळोवेळी उचलून धरला. परंतु, मनपा प्रशासन पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीविरूद्ध कठोर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहे. विवेकानंदनगर, लक्ष्मीनगर, पीडब्ल्यूडी कॉर्टर, दत्तनगर, सिव्हील लाईन परिसरातील नागरिकांकडून अनेकवेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मनपा याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. आतातरी पालिकेने पाणी समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.