शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

लिकर लॉबी पुन्हा मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली नाही. मुंबई, दिल्लीपर्यंत या संघटनांनी वाऱ्या केल्या.

ठळक मुद्देमोर्चेबांधणी सुरू : दारूबंदी उठविण्यावर जिल्हाभर जोरदार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठविणार असल्याचे अनौपचारिक संकेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देताच जिल्ह्यात या विषयावर आता जोरदार रणकंदन सुरू झाले आहे. दरम्यान, तब्बल सहा वर्षानंतर अचानक आशा पल्लवित झाल्याने जिल्ह्यातील लिंकर लॉबी पुन्हा मैदानात आली असून त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली नाही. मुंबई, दिल्लीपर्यंत या संघटनांनी वाऱ्या केल्या. एवढेच नाही तर न्यायालयाचे दारही ठोठावले. मात्र न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास नकार देत दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मात्र लिंकर लॉबीचे आव्हान संपुष्टात आले. पाच वर्ष दारूबंदी कायम राहिली.दरम्यान, जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैध दारूचा महापूर आहे. बोगस दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दारूबंदीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उठवायची होती. परंतु सध्यास्थितीत कोरोना महामारी असल्याने दारूबंदी उठविण्यास विलंब होत आहे. आपण कोणत्याही आंदोलनाला घाबरणार नाही. येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविणार असल्याचे अनौपचारिकरित्या सूतोवाच ना. वडेट्टीवार यांनी चिमुरात दोन दिवसांपूर्वी केले. ना. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे आतापर्यंत तलवार मॅन करून बसलेली लिंकर लॉबी पुन्हा मैदानात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी करीत वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणीत ही लॉबी सध्या व्यस्त दिसत आहे.बारच्या जागेवर हॉटेल्सदारूबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व बिअर बार, वाईन शॉपला टाळे लागले. काही महिन्यांपर्यंत ते तसेच होते. मात्र दारूबंदी उठविण्यात न आल्याने अनेकांनी बिअर बारच्या जागेवर कोणताही बदल न करता हॉटेल्स सुरू केले. आज ना उद्या दारूबंदी उठेल या आशेवरच त्यांनी बिअर बारची इतर व्यवसायासाठी तोडफोड केली नसावी, असेच दिसून येते.निवडणुकीतही गाजला मुद्दालोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावर मोठ्या प्रमाणात रणकंदन झाले. त्यानंतर काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही चंद्रपूरच्या दारूबंदीवर चर्चा झाली. एवढेच नव्हे तर उमेदवारांच्या भाषणांमधून दारूबंदीवर वक्तव्ये झालीत. यातून मतदारांचा कानोसा घेण्यात आला होता.