शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

दलितवस्तीत उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:33 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : महावितरणने फुलविले १३२४ चेहऱ्यांवर हास्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एकूूण १३२४ चेहºयांवर हास्य फुलविण्यात महावितरणचे चंद्रपूर परिमंडळ यशस्वी ठरले आहे.या अभियानांतर्गत चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील येल्लापूर येथे १३८, गुडसेल्ला येथे ११० व कुंभेझरी येथे १६६, चिमूर तालुक्यातील वडसी येथे ५२, ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे १७, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे ३४ व गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे ७ घरात वीज जोडणी करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे ७०, अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे १११, महागाव येथे ८३, चेरपल्ली येथे ६२, गोंिवंदगाव येथे ६०, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा येथे १७१, जाफराबाद येथे १३९ व गुमलकोंडा येथे १०४ गावात वीज जोडण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ८०० व चंद्रपूर जिल्ह्यातील ५२४ अशा एकूण १३२४ गरीब घरात प्रकाशाची किरणे पोहोचल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.राज्यभरातील १०२ गावात हे अभियान राबविण्यात येत असून यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा १९२ गावात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात विदर्भातील १४० गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर लावण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येत आहे. उज्ज्वला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वीजजोडणी व एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले.उद्दिष्ट करणार पूर्णपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हसके यांच्या मार्गदर्शनात संबंधित विभाग व उपविभाग वीज जोडणी देण्याचे दायित्व पार पाडत आहे. दरम्यान, शासनाने दिलेले उद्दिष्ट महावितरणच्या वतीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज