शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

दलितवस्तीत उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:33 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : महावितरणने फुलविले १३२४ चेहऱ्यांवर हास्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एकूूण १३२४ चेहºयांवर हास्य फुलविण्यात महावितरणचे चंद्रपूर परिमंडळ यशस्वी ठरले आहे.या अभियानांतर्गत चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील येल्लापूर येथे १३८, गुडसेल्ला येथे ११० व कुंभेझरी येथे १६६, चिमूर तालुक्यातील वडसी येथे ५२, ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे १७, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे ३४ व गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे ७ घरात वीज जोडणी करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे ७०, अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे १११, महागाव येथे ८३, चेरपल्ली येथे ६२, गोंिवंदगाव येथे ६०, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा येथे १७१, जाफराबाद येथे १३९ व गुमलकोंडा येथे १०४ गावात वीज जोडण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ८०० व चंद्रपूर जिल्ह्यातील ५२४ अशा एकूण १३२४ गरीब घरात प्रकाशाची किरणे पोहोचल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.राज्यभरातील १०२ गावात हे अभियान राबविण्यात येत असून यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा १९२ गावात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात विदर्भातील १४० गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर लावण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येत आहे. उज्ज्वला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वीजजोडणी व एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले.उद्दिष्ट करणार पूर्णपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हसके यांच्या मार्गदर्शनात संबंधित विभाग व उपविभाग वीज जोडणी देण्याचे दायित्व पार पाडत आहे. दरम्यान, शासनाने दिलेले उद्दिष्ट महावितरणच्या वतीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज