शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गरीब आदिवासींच्या ५० घरांत उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:18 IST

वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेचा आधार : वीज कंपनीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.जिवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा, सेवादानगर व आंबेझरी ही गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगरव्याप्त भागात तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह शेती तसेच जंगलातून मध गोळा करण्यावर चालते. तालुका मुख्यालयापासून जवळपास १५ ते २० किमी अंतरावर असणाºया या चारही गावांत १३ ते १४ घरांची वस्ती आहे. ही चारही गावे आदिवासी गावे असून कुळाची घरे व विजेची सोय नसल्याने दिव्याच्या उजेडाखाली येथील नागरिकांना जीवन जगावे लागत होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याचा आधार घ्यावा लागत होता. याची दखल घेत चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मांगिलाल राठोड तसेच कनिष्ठ अभियंता विनोद भलमे यांनी पुढकार घेत घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा गावातील ११, सेवादासनगर गावातील २९ व आंबेझरी गावातील १२ अशा ५० कुटुंबाच्या जीवनात सौभाग्य योजनेतून प्रकाशाची किरणे पोहोचवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली आहे.दुर्बल लाभार्थ्यांना नि:शुल्क वीजजोडणीपतंप्रधान यांनी सौभाग्य या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देवून राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सौभाग्य योजना वीज कंपनीकडून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणी देण्यात येणार असून आर्थिकदृष्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क देण्यात येत आहे.