शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गरीब आदिवासींच्या ५० घरांत उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:18 IST

वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेचा आधार : वीज कंपनीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.जिवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा, सेवादानगर व आंबेझरी ही गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगरव्याप्त भागात तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह शेती तसेच जंगलातून मध गोळा करण्यावर चालते. तालुका मुख्यालयापासून जवळपास १५ ते २० किमी अंतरावर असणाºया या चारही गावांत १३ ते १४ घरांची वस्ती आहे. ही चारही गावे आदिवासी गावे असून कुळाची घरे व विजेची सोय नसल्याने दिव्याच्या उजेडाखाली येथील नागरिकांना जीवन जगावे लागत होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याचा आधार घ्यावा लागत होता. याची दखल घेत चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मांगिलाल राठोड तसेच कनिष्ठ अभियंता विनोद भलमे यांनी पुढकार घेत घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा गावातील ११, सेवादासनगर गावातील २९ व आंबेझरी गावातील १२ अशा ५० कुटुंबाच्या जीवनात सौभाग्य योजनेतून प्रकाशाची किरणे पोहोचवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली आहे.दुर्बल लाभार्थ्यांना नि:शुल्क वीजजोडणीपतंप्रधान यांनी सौभाग्य या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देवून राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सौभाग्य योजना वीज कंपनीकडून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणी देण्यात येणार असून आर्थिकदृष्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क देण्यात येत आहे.