शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गरीब आदिवासींच्या ५० घरांत उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:18 IST

वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेचा आधार : वीज कंपनीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.जिवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा, सेवादानगर व आंबेझरी ही गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगरव्याप्त भागात तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह शेती तसेच जंगलातून मध गोळा करण्यावर चालते. तालुका मुख्यालयापासून जवळपास १५ ते २० किमी अंतरावर असणाºया या चारही गावांत १३ ते १४ घरांची वस्ती आहे. ही चारही गावे आदिवासी गावे असून कुळाची घरे व विजेची सोय नसल्याने दिव्याच्या उजेडाखाली येथील नागरिकांना जीवन जगावे लागत होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याचा आधार घ्यावा लागत होता. याची दखल घेत चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मांगिलाल राठोड तसेच कनिष्ठ अभियंता विनोद भलमे यांनी पुढकार घेत घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा गावातील ११, सेवादासनगर गावातील २९ व आंबेझरी गावातील १२ अशा ५० कुटुंबाच्या जीवनात सौभाग्य योजनेतून प्रकाशाची किरणे पोहोचवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली आहे.दुर्बल लाभार्थ्यांना नि:शुल्क वीजजोडणीपतंप्रधान यांनी सौभाग्य या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देवून राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सौभाग्य योजना वीज कंपनीकडून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणी देण्यात येणार असून आर्थिकदृष्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क देण्यात येत आहे.