शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:08 IST

वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

ठळक मुद्देवेकोलि कामगार वसाहतीतील घरे मोडकडीस : भिंतीला पडल्या भेगा

गजानन साखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे वेकोलि कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला आहे.याशिवाय या वसाहतीतील नाल्यांची दुरूस्ती व साफसफाई नियमित होत नसल्याने कामगार कुटुंबीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वेळोवेळी क्वार्टर व नाली दुरूस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी कामगारांकडून होत असली तरी व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.वेकोलिच्या निलजई कोळसा खाण क्षेत्रातील सुंदरनगर कामगार वसाहत आहे. तेथील क्वार्टरच्या भिंती कोसळत आहे. अनेक क्वार्टरच्या भिंतींना ठिक ठिकाणी तडे गेलेले आहेत. क्वार्टरच्या भिंती केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहे. अशाही अवस्थेत कामगार आपल्या कुटुंबासह याच घरात राहत आहे. दिवसा किंवा रात्री झोपताना केव्हा दुर्घटना घडेल, हे सांगता येत नाही.याशिवाय नाल्यांची दुरूस्ती होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कामगारांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.यापूर्वी या कामगार वसाहतमधील क्वार्टरची पडझड झाली. मात्र सुदैवाने कामगार व त्याचे कुटुंबीय बचावले. क्वार्टरची दुरूस्ती व्हावी, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी कामगारांकडून वेळोवेळी होत आहे. या ठिकाणी कार्यरत कामगार संघटनांचे पदाधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगाराकडून होत आहे.स्वखर्चाने दुरुस्तीघराच्या भिंती केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे कामगार व त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष देत नसल्याने काही कामगारांना नाईलाजाने स्वत: आपल्या खर्चाने क्वार्टर ची दुरूस्ती करावी लागत आहे. सध्या सुंदरनगर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने कामगारांना कर्तव्यावर ये-जा करतानाही जीव धोक्यात घालावा लागत आहे. एकूणच आता कामगारांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे वेकोलिने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.