शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

जीवन संपले, तरीही मिळाला नाही न्याय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुजविली. त्या जागेवर ते पीक घेत आहेत. त्यामुळे बनकर यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी :  तालुक्यातील कालेता येथील मृत श्रीधर बनकर यांची शेती मरारमेंढा  येथे आहे. एकाने पाणी वाहून जाणारा नाला माती टाकून बुजविला. त्यामुळे बनकर यांच्या शेतात दरवर्षी पाणी साचून धान पिकाचे नुकसान होते. याबाबत  २०१६ पासून पत्रव्यवहार करून शासनाकडून न्याय मिळावा, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांचा मृत्यू मार्च २०२१ मध्ये झाला. त्यांची वारसदार बहीण मंदा डांगे यांनीदेखील त्यांच्यानंतर पत्रव्यवहार करून शासनाकडून न्यायाची अपेक्षा केली. मात्र, अद्याप न्याय मिळाला नाही. शेतकऱ्याचे जीवन संपले. मात्र, शासनाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते. मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुजविली. त्या जागेवर ते पीक घेत आहेत. त्यामुळे बनकर यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे. अशी तक्रार २०१६ मध्ये श्रीधर बनकर यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. त्यांचा मृत्यू २२ मार्च २०२१ ला झाला. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.त्यानंतर त्यांचे वारसदार मंदा डांगे यांनी उपअभियंता जिल्हा परिषद उपविभाग, ब्रम्हपुरी, तहसीलदार यांच्याकडे २०२१ ला तक्रार केली; तर २० जानेवारी २०२२ ला तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्र देऊन ५ - ६ लक्ष रुपयांचे झालेले नुकसान तसेच भविष्यात होणारी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भावाच्या मृत्यूनंतर वारसदार बहिणीला शासनाकडून न्याय मिळेल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मंडल अधिकाऱ्यांनीही दिला अभिप्रायमंडल अधिकाऱ्यांनी  पंचनामा करून अर्जदाराचे नुकसान होत असल्याचे, गैरअर्जदार यांच्या शेताजवळ वाहीची रुंदी कमी असल्याचे तसेच वाहीत झुडुपे  वाढली असल्याचा अभिप्राय दिला. तसेच गैरअर्जआर यांच्या शेताची मोजणी करण्याचेही डिसेंबर २०२१ च्या लेखी पत्रात नमूद आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प