शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

जीवनानुभवाचे सकारात्मक दृष्टीने लेखन होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : मानवी जीवनात बरे-वाईट अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्या जीवनानुभवाचे ...

चंद्रपूर : मानवी जीवनात बरे-वाईट अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्या जीवनानुभवाचे उत्तम लेखन झाले पाहिजे. साहित्य लेखनातून जीवनाला नवी ऊर्जा मिळते, असे मत पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी येथे केले.

नक्षत्राचं देण काव्यमंच द्वारा आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

रमाई जयंती दिनी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मिल्ट्री स्कूलचे माजी प्राचार्य तथा पर्यावरण स्तंभलेखक विजय मार्कंडेवार, भाष्यकार प्रा. डाॅ. राज मुसने, जि.प.चे सेवानिवृत्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीधर मालेकर, ग्रंथलेखक यवनाश्व गेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यवनाश्व गेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्मरणातली निरंजना या पुस्तकात लेखकांनी व्यक्त केलेली तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे, त्यात दिवंगत पत्नीविषयीच्या आठवणीचा पूर दिसून येतो, असे मत प्रा.डाॅ. मुसने यांनी व्यक्त केले. सांसरिक अनुबंंध आणि मानसिक साहचर्याचे दर्शन घडते, असे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी गणित विषयात गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्या अभय घटे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन नामदेव गेडकर तर आभार नारायण सहारे यांनी मानले. यावेळी प्रा. श्रावण बानासुरे, रमेश रामटेके, प्राचार्य डोंगे, प्रकाश चांभारे, विलास उगे, सरिता गव्हारे, देवराव कोंडेकर, मंजुषा खानेकर, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, श्रीकांत प्रतापवार, प्रा. मोरे, डाॅ. धर्मा गांवडे, हेमश्री मेश्राम आदींची उपस्थिती होती.