शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

जीवनानुभवाचे सकारात्मक दृष्टीने लेखन होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : मानवी जीवनात बरे-वाईट अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्या जीवनानुभवाचे ...

चंद्रपूर : मानवी जीवनात बरे-वाईट अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्या जीवनानुभवाचे उत्तम लेखन झाले पाहिजे. साहित्य लेखनातून जीवनाला नवी ऊर्जा मिळते, असे मत पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी येथे केले.

नक्षत्राचं देण काव्यमंच द्वारा आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

रमाई जयंती दिनी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मिल्ट्री स्कूलचे माजी प्राचार्य तथा पर्यावरण स्तंभलेखक विजय मार्कंडेवार, भाष्यकार प्रा. डाॅ. राज मुसने, जि.प.चे सेवानिवृत्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीधर मालेकर, ग्रंथलेखक यवनाश्व गेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यवनाश्व गेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्मरणातली निरंजना या पुस्तकात लेखकांनी व्यक्त केलेली तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे, त्यात दिवंगत पत्नीविषयीच्या आठवणीचा पूर दिसून येतो, असे मत प्रा.डाॅ. मुसने यांनी व्यक्त केले. सांसरिक अनुबंंध आणि मानसिक साहचर्याचे दर्शन घडते, असे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी गणित विषयात गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्या अभय घटे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन नामदेव गेडकर तर आभार नारायण सहारे यांनी मानले. यावेळी प्रा. श्रावण बानासुरे, रमेश रामटेके, प्राचार्य डोंगे, प्रकाश चांभारे, विलास उगे, सरिता गव्हारे, देवराव कोंडेकर, मंजुषा खानेकर, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, श्रीकांत प्रतापवार, प्रा. मोरे, डाॅ. धर्मा गांवडे, हेमश्री मेश्राम आदींची उपस्थिती होती.